शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

‘अ‍ॅट्रॉसिटी’ रद्द करा, ही मराठ्यांची मागणी नाही

By admin | Updated: September 21, 2016 05:50 IST

अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या मोर्चांमधून कुठेही समोर आलेली नाही

मुंबई : अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या मोर्चांमधून कुठेही समोर आलेली नाही. पण या कायद्याचा गैरवापर होऊ नये, अशी सर्वांची भूमिका असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ग्रामीण भागातील राजकारणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यामुळे लोकांच्या मनात राग आहे. हा कायदा रद्द करावा असे आमचे मत नाही; पण गुन्हा नोंदवताना या कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये हा लोकांचा आग्रह असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.मराठा समाजात पसरलेला हा असंतोष गेल्या १५ वर्षांतील आहे की, सत्तेची दोन वर्षे पूर्ण करत असलेल्या भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात आहे, असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, लोक नाराज आहेत. कोणाच्या काळातला हा असंतोष आहे हा विषय येथे नाही. आम्ही जे काही केले त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही विरोधात आहोत; पण या सरकारने काहीच केलेले नाही हा रागही आहेच, असे खा. चव्हाण म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी काँग्रेससह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसमुळेच आमचा पराभव झाल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता खा. चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम आमचे नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा सन्मान कायम राखूनच युती केली जाईल असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>‘आम्ही आमचा पक्ष वाढवू’राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम आमचे नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवू. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्याकडे बिल्डरांच्या फायली घेऊन यायचे, असे त्यांनी सांगितले आहे, तुमच्या काळात असे होत होते का? असा सवाल केला असता ‘माझ्या काळात असे काही नव्हते’ असे उत्तर चव्हाण यांनी दिले.