शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘या’ समस्याही सोडवता येत नाहीत?

By admin | Updated: March 2, 2017 06:04 IST

आंतरराष्ट्रीय खेळाला परवानगी देण्यासारख्या किरकोळ समस्या सोडवू शकत नसाल, तर जागतिकीकरणचा दावा व ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेचा फायदा काय?

मुंबई : आंतरराष्ट्रीय खेळाला परवानगी देण्यासारख्या किरकोळ समस्या सोडवू शकत नसाल, तर जागतिकीकरणचा दावा व ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेचा फायदा काय? असा सवाल उच्च न्यायालयाने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला. याबाबत मुंबई जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची वागणे धक्कादायक आहे. असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ मुंबईत व्हावा, याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का? असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान साधले.पी-वन पॉवरबोट इंडियन ग्रँड प्रिक्स आॅफ दि सीस् या कार्यक्रमाचे आयोजन प्रोकॅम इंटरनॅशनल प्रा.लि. ने ३ मार्च ते ५ पार्चपर्यंत मरिन ड्राइव्ह येथे केले आहे. स्पर्धकांना समुद्रात उतरण्यासाठी चौपाटीवर तात्पुरती जेटी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी पोर्टेबल केबिन बनवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कंपनीने महापालिकेकडे परवानगी मागितली. मात्र, महापालिकेने नकार दिला. महापालिकेने कंपनीला उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या विशेष समितीकडे परवानगी मागण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कंपनीने समितीला विनंतीपत्र पाठवले. मात्र, समितीने त्यांना उच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्यास सांगितले. त्यानुसार, कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या.व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठापुढे होती.कंपनीने आवश्यक असलेल्या सर्व परवानगी आपल्याकडे असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनीला या ठिकाणी तात्पुरती जेटी व पोर्टेबल केबिन उभारण्याची परवानगी दिली. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवसांत उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले.सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला चांगलेच फटकारले. ‘अशा किरकोळ समस्या सोडवू शकत नसाल, तर जागतिकीकरणाचा व ‘मेक इन इंडिया’चा दावा काय कामाचा? आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच हे जाणून घ्यायचे आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात का आले नाही? आपल्याला काही घेणे-देणे नाही, असा अविर्भाव जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे वर्तनही धक्कादायक आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राला लाभलेल्या सुंदर व मोठ्या समुद्रकिनाऱ्याचा फायदा सरकारने घ्यावा, असेही न्या. कानडे यांनी म्हटले. (प्रतिनिधी)तेव्हा कर्तव्याचे काय होते?‘जगात सर्व ठिकाणी हा खेळ चालतो. मग मुंबईला यापासून वंचित का ठेवावे? यामुळे अनेक पर्यटक मुंबईकडे आकर्षित होतील. अवघे दोनच दिवस तात्पुरते बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, नेमकी याच वेळी महापालिकेला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. मुंबई असंख्य बेकायदेशीर बांधकामे बांधण्यात आली आहेत, त्या वेळी तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे काय होते?’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेलाही टोला लगावला.