शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वासू’ माणूस मिळेना?

By admin | Updated: April 20, 2016 05:41 IST

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भर न्यायालयात सरकारवरच टीका करून वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे

दीप्ती देशमुख, मुंबईस्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भर न्यायालयात सरकारवरच टीका करून वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा देऊन तब्बल २९ दिवस उलटले, त्यानंतरही या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. राज्य सरकारला महाधिवक्ता या घटनात्मक पदासाठी ‘विश्वासू माणूस’ मिळत नसल्याने ही नामुष्की ओढवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेना एकाच वकिलाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, असा वकील सध्या तरी मुंबई, औरंगाबाद व नागपूर या तिन्ही खंडपीठामध्ये नाही. त्यामुळे पुढे आणखी काही काळ हे पद रिक्तच राहिल, अशीच शक्यता आहे. सध्या तरी प्रभारी महाधिवक्ता वेळ मारून नेत आहेत. तरीही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एवढे दिवस हे पद रिक्त ठेवणे ही बाब लाजिरवाणी असल्याची चर्चा सध्या वकील मंडळींमध्ये सुरू आहे.हे पद घटनात्मक असल्याने, काही कारणास्तव हे पद रिक्त झाल्यास तातडीने भरणे सरकारसाठी बंधनकारक असते. मात्र, युती सरकारला दोन वेळा हे पद भरण्यासाठी विलंब झाला. भाजपा सरकार जेव्हा सत्तेवर आले, तेव्हाही हे पद रिक्तच होते. बऱ्याच उलटसुलट चर्चा-मंथन झाल्यानंतर नागपूरचे ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, गोवंश हत्याबंदी प्रकरणात मनोहर यांनी सरकारतर्फे खळबळजनक विधान केल्याने त्यांना राजीनामा देणे भाग पडले.या घटनेनंतर महिनाभर महाधिवक्ता हे पद रिक्तच होते. अखेरीस राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर, सरकारने तातडीने ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती केली. स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर भर न्यायालयात टीकेचा आसूड ओढल्याने अ‍ॅड. अणे यांची महाधिवक्तापदाची कारकिर्द वादग्रस्त ठरली. अ‍ॅड. अणे यांच्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्येही चांगलीच जुंपली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले, कामकाज रोखण्यात आले. त्यामुळे अ‍ॅड. अणे यांनी २२ मार्च रोजी महाधिकवक्तापदाचा राजीनामा दिला. अ‍ॅड. अणे यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस सरकारने नागपूर खंडपीठातील अ‍ॅडिशनल सॉलिसिटर अ‍ॅड. रोहित देव यांना प्रभारी महाधिवक्ता म्हणून मुंबईत बोलावून घेतले. फडणवीस सरकार रोहित देव यांच्याकडे ‘महाधिवक्तापद’ सोपवण्याचा विचार करत आहे. तशी विचारणाही त्यांच्याकडे करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले. ‘सरकारची चूक निदर्शनास आणणे गरजेचे’महाधिवक्तापद घटनात्मक आहे. हे पद भूषविणाऱ्या व्यक्तीला विशेष अधिकार आहेत. या पदावर बसणारी व्यक्ती ‘सरकारी कर्मचारी’ नाही. त्यामुळे या पदावर बसणाऱ्याची भूमिका केवळ सरकारची वकिली करण्याइतपत मर्यादित नसावी. सरकार जर कुठे चुकत असेल, तर ती चूक लक्षात आणून देण्याचे कर्तव्य महाधिवक्त्यांचे आहे.- अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता