शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 17:20 IST

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय तरणोपाय नसून, सदरहू घोषणा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण तातडीने नियंत्रणात आणायचे असेल तर सरकारने विशेष अधिवेशन बोलावून कर्जमाफीची घोषणा करणे अत्यावश्यक झाले आहे, असे विखे पाटील यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.शासकीय तूर खरेदीतील अनागोंदी कारभाराबाबतही राज्यपालांना अवगत करण्यात आले. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. नुकसानभरपाई देत नाही. आता शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाची खरेदी करायला अन् भाव द्यायलाही सरकार तयार नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सरकारच्या नियोजनशून्य व उदासीन कारभारामुळे संपूर्ण तुरीची शासकीय खरेदी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर अत्यल्प दराने व्यापाऱ्यांना विकावी लागली. याची नुकसानभरपाई म्हणून तूर उत्पादकांना बोनस देण्याची मागणी त्यांनी मांडली. शेतकऱ्यांची हलाखीची आर्थिक स्थिती पाहता कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणीही विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी देखील राज्यपालांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत माहिती दिली. सदरहू शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, संयुक्त जनता दलाचे आ. कपिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने आमदार उपस्थित होते.