शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे अधिवेशन बोलवा

By admin | Updated: April 27, 2017 23:57 IST

पृथ्वीराज चव्हाण : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर

२ मे रोजी राज्यपालांना शिष्टमंडळ भेटणारकऱ्हाड : ‘महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशपेक्षा श्रीमंत राज्य आहे. जर उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असेल तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी शेती प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आम्हा सर्व विरोधकांची मागणी आहे. यासंदर्भात येत्या २ मे रोजी शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील वेणूताई चव्हाण ट्रस्टमध्ये संघर्ष यात्रेनिमित्त कऱ्हाडात आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे, आमदार अबू आझमी, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आनंदराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अनेक आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो, हमीभाव देतो, तुरीच्या शेवटच्या कणापर्यंत खरेदी करतो ही त्यापैकीच काही आश्वासने आहेत. मात्र, ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, पाळली जात नाहीत म्हणूनच आम्हाला संघर्ष यात्रा काढावी लागली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच्या कालावधीत सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मात्र, आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाग पाडू.’ सुनील तटकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी १०५ जवानांना बलिदान द्यावे लागले. मात्र, आज पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वी विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्या व्हायच्या. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही आत्महत्येचे लोण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. तूर खरेदीवरून शेतकरी अडचणीत आला असून, योग्य भाव शेतकऱ्यांच्या हातात पडलाच पाहिजे, असे सांगत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोलचा दर जास्त आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून महागाई वाढत आहे.’ जोगेंद्र कवाडे म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बजेट मांडले जात असताना या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख आहे का? आणि असेल तर किती कर्जमाफी केली? एवढे आधी सांगा, अशी आम्ही विरोधकांनी मागणी केली. मात्र, त्याचे फळ म्हणून १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. सभागृहात न्याय मिळत नाही म्हणून या विश्वासघातकी सरकारला जाब विचारण्यासाठी ही संघर्ष यात्रा आम्हाला काढावी लागली आहे. बुलेट ट्रेनसाठी, समृद्धी मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांना ३० हजार ५०० कोटींची कर्जमाफी करायला पैसे नाहीत, ही बाब दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या या सरकारला धडा शिकविण्यासाठी या संघर्ष यात्रेत लोकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अजित पवार म्हणाले, ‘राजकारण करण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आलेली नाही. तर आम्हाला अडचणीतील शेतकऱ्याला बाहेर काढायचे आहे. म्हणून ही यात्रा काढली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती जरी आरोप केले तरी त्या आरोपांना जनता थारा देणार नाही, असे सांगतच शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत छेडले असता शरद पवार यांनी यावर नुकतेच उत्तर दिले आहे. मी त्यावर बोलणे उचित नाही,’ असे अजित पवार म्हणाले. दहा किलो तुरडाळ भेट देणारशेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतचा संघर्ष आता सुरूच राहणार आहे. १ मे रोजी विरोधी पक्षाचे आमदार ज्या-ज्या शासकीय कार्यालयात ध्वजारोहणाला जाणार आहेत तेथे ध्वजारोहण संपल्यानंतर तेथील प्रमुख शासकीय अधिकाऱ्याला आमच्या वतीने दहा किलो तुरडाळ भेट देऊन सरकारच्या तुरडाळ खरेदी धोरणाचा निषेध करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी बोलताना सांगितले. त्यांना विचारून सांगतोनारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, याबाबत अजित पवारांना विचारले असता, ‘खरंतर याबाबतीत राणेंना विचारले तर बरे होईल,’ असे अजित पवार म्हणाले. तसेच माझी अद्याप त्यांच्याशी भेट झाली नाही. भेट झाली की तुमचा प्रश्न मी त्यांना आवर्जून विचारेन. त्यांनी दिलेले उत्तरही तुमच्यापर्यंत पोहोचवू, असे मिश्कील उत्तर पवारांनी दिले. एकटा जीव अन् सदाशिवआमदार बच्चू कडू-पाटील हे सत्ताधाऱ्यांबरोबर पाठीमागच्या सरकारवरही टीका करीत आहेत, याबाबत विचारले असता ‘बच्चू कडू-पाटील यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्या माध्यमातून मतदारसंघात मोठी कामे करून घेतली आहेत. आता सहानुभूती मिळविण्यासाठी ते काय बोलत असतील हे मला माहीत नाही; पण त्यांचा एकटा जीव सदाशिव आहे. त्यांच्यासोबत दुसरे कोणीही नाही,’ असा चिमटाही अजित पवार यांनी काढला. सदाभाऊंना वाण आणि गुणही लागला‘शेतकरी संघटनेचे नेते आता सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी आहेत. सदाभाऊ तर आता जवळजवळ भाजपवासी झाले आहेत. त्यांना वाण नाही तर गुण लागतो, या म्हणीप्रमाणे गुण आणि वाणही लागल्याचे दिसत असून, सत्तेत असण्यापूर्वीची त्यांची वक्तव्ये आणि आत्ताची वक्तव्ये यामध्ये मोठा फरक पडला असून, शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून कोसो दूर गेले आहेत,’ अशी टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली.