शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारातही सांगलीला ठेंगा

By admin | Updated: December 6, 2014 00:31 IST

कार्यकर्त्यांत नाराजी : पालकमंत्रीही आयात करावा लागणार

सांगली : राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या विस्तारातही सांगली जिल्ह्याला ठेंगा दाखवण्यात आला. जिल्ह्यात भाजप-शिवसेनेला आठपैकी पाच जागा मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सांगलीला स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे पालकमंत्रीही आयात करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची भाजपच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी चर्चा होती, मात्र त्यांचा समावेश झाला नाही. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने आ. नाईक, आ. खाडे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आठवड्यापासून मुंबईत तळ ठोकला होता. दोघांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले होते. मात्र विस्तारातही जिल्ह्याच्या पदरी निराशा पडली. भाजपमधील अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचे मंत्रीपद हुकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने आता पालकमंत्रीपदी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री न मिळाल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची सभा झाली नसल्याने विकास कामांना मंजुरी रखडली आहे. ग्राहक परिषद, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना, दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्तीही पालकमंत्र्यांअभावी लांबणीवर पडली आहे. राज्यात भाजप, सेना युती होणे महत्त्वाचे होते. राज्याला स्थिर सरकारची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. भविष्यात जिल्'ाला स्थान मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. नागपूर अधिवेशनानंतर जिल्'ातील सदस्य मंत्री होतील. मात्र थोडी प्रतीक्षा करायला हवी. - शेखर इनामदार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप. पहिल्यादाच सांगलीला स्थान नाही राजकीयदृष्ट्या आघाडीवर असणाऱ्या सांगलीला पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबरच जिल्ह्यातील सदस्यांचा शपथविधी होत असे. नागपूरच्या अधिवेशनानंतर जिल्ह्याला स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.