शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मंत्रिमंडळ विस्तारातही सांगलीला ठेंगा

By admin | Updated: December 6, 2014 00:31 IST

कार्यकर्त्यांत नाराजी : पालकमंत्रीही आयात करावा लागणार

सांगली : राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या विस्तारातही सांगली जिल्ह्याला ठेंगा दाखवण्यात आला. जिल्ह्यात भाजप-शिवसेनेला आठपैकी पाच जागा मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सांगलीला स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे पालकमंत्रीही आयात करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची भाजपच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी चर्चा होती, मात्र त्यांचा समावेश झाला नाही. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने आ. नाईक, आ. खाडे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आठवड्यापासून मुंबईत तळ ठोकला होता. दोघांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले होते. मात्र विस्तारातही जिल्ह्याच्या पदरी निराशा पडली. भाजपमधील अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचे मंत्रीपद हुकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने आता पालकमंत्रीपदी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री न मिळाल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची सभा झाली नसल्याने विकास कामांना मंजुरी रखडली आहे. ग्राहक परिषद, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना, दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्तीही पालकमंत्र्यांअभावी लांबणीवर पडली आहे. राज्यात भाजप, सेना युती होणे महत्त्वाचे होते. राज्याला स्थिर सरकारची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. भविष्यात जिल्'ाला स्थान मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. नागपूर अधिवेशनानंतर जिल्'ातील सदस्य मंत्री होतील. मात्र थोडी प्रतीक्षा करायला हवी. - शेखर इनामदार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप. पहिल्यादाच सांगलीला स्थान नाही राजकीयदृष्ट्या आघाडीवर असणाऱ्या सांगलीला पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबरच जिल्ह्यातील सदस्यांचा शपथविधी होत असे. नागपूरच्या अधिवेशनानंतर जिल्ह्याला स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.