शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मंत्रिमंडळ बैठक : ४२९ कोटींच्या प्रकल्पावरून धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:46 IST

यदु जोशी मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक, अग्निशमन दलासाठी १०१ वा रुग्णवाहिकेसाठी १०८ अशा तीन क्रमांकाऐवजी आपात्कालिन सेवांसाठी एकच टोल फ्री क्रमांक स्थापित करण्यासह राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी ४२९ कोटी रुपये खर्च करण्याच्या मुद्यावरून गृह आणि वित्त विभागात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. प्रकल्पाचा मूळ हेतू साध्य होण्याबाबत वित्त ...

यदु जोशी मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक, अग्निशमन दलासाठी १०१ वा रुग्णवाहिकेसाठी १०८ अशा तीन क्रमांकाऐवजी आपात्कालिन सेवांसाठी एकच टोल फ्री क्रमांक स्थापित करण्यासह राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी ४२९ कोटी रुपये खर्च करण्याच्या मुद्यावरून गृह आणि वित्त विभागात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. प्रकल्पाचा मूळ हेतू साध्य होण्याबाबत वित्त विभागाने साशंकता व्यक्त केली आहे.या आधुनिकीकरणावर ३८४ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच, याच प्रकल्पांतर्गत वरळी; मुंबई येथे त्यासाठी उभारण्यात यावयाच्या संनियंत्रण, नियोजन व विश्लेषण केंद्रासाठी ४४ कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात येतील.विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तथापि, या निमित्ताने दोन प्रमुख विभागांमधील मतभिन्नतादेखील समोर आली.पहिल्या टप्प्यात नागपूर आणि पुणे येथील प्रकल्प कार्यान्वित करण्यात येतील. त्यानंतरच्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण केले जाईल आणि आपात्कालिन सेवेचे ‘डायल १००’ या सेवेशी एकत्रिकरण करण्यात येईल. शेवटच्या टप्प्यात रुग्णवाहिका सेवेच्या १०८ ऐवजी १०० हा एकच क्रमांक असेल. शेवटच्या टप्प्यात अग्निशमन यंत्रणेसाठीच्या १०१ क्रमांकाचे एकत्रिकरण १०० सोबत करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख आपात्कालिन क्रमांकांच्या एकत्रिकरणाचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतला असून विविध राज्ये आता त्याची अंमलबजावणी करणार आहेत.वित्त विभागाने आधी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्याचे मुख्य कारण आपत्कालिन व्यवस्था एकाच छताखाली येतील, असे गृह विभागाने आधी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सादरीकरणात म्हटले होते. तथापि, मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जो प्रस्ताव आला त्यात ही योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाईल आणि पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण केले जाईल, असे नमूद केले. त्यामुळे मूळ सादरीकरणात दाखविलेला उद्देश सफल होत नाही, असा शेरा वित्त विभागाने दिला आहे. गृह विभागाने मात्र, या प्रकल्पामुळे पोलीस नियंत्रण यंत्रणेचे आधुनिकीरण होईल आणि आपत्कालिन सेवा एकाच छत्राखाली येतीलच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या सादरीकरणाची वित्त विभागाला कल्पना देण्यात आली होती.