शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मंत्रिमंडळ निघाले दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

By admin | Updated: February 24, 2016 04:01 IST

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत भीषण परिस्थिती असताना, सरकार उदासीन असल्याची टीका होऊ लागल्याने, सर्व मंत्र्यांनी एक दिवसाचा

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत भीषण परिस्थिती असताना, सरकार उदासीन असल्याची टीका होऊ लागल्याने, सर्व मंत्र्यांनी एक दिवसाचा दौरा करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानुसार आता मंत्रिमंडळातील सदस्य मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी स्वत: गेले पाहिजे, अशी भूमिका घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच दिवशी सर्व मंत्र्यांनी त्या भागात जावे, असे सांगितले. त्यानुसार महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या चौघांनी एकत्र बसून मंत्र्यांचे दौरे निश्चित केले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा असेल. दौऱ्यावर जाणारे मंत्री प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतील, दुष्काळ निवारणासाठी कार्यरत यंत्रणांशी चर्चा करतील, चारा छावण्यांना भेट देतील, पाणी समस्येचा आढावा घेतील, तसेच शेतकरी, नागरिकांना भेटून नेमक्या समस्या जाणून घेऊन, त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. दुष्काळ निवारणाच्या मुद्द्यावर सरकारची कसोटी लागणार आहे, त्यापूर्वी हा दौरा होणार आहे.अधिकाऱ्यांविरुद्ध मंत्र्यांची तक्रार!दुष्काळ निवारण कार्यात अधिकारी सहकार्य करीत नाहीत, अशी तक्रार काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यावर भीषण दुष्काळी परिस्थिती असतानादेखील यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसेल, तर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)उशिरा सुचलेले शहाणपणअधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील मंत्री दुष्काळ दौऱ्यांवर जात असून, हे दौरे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तीन महिन्यांपूर्वी असे दौरे केले असते, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, असे मुंडे म्हणाले.शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराजजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचे समजते. ‘सरकारचे पैसे वाचविणारे उपाय मी अनेकदा सुचवितो, पण त्याची दखल घेतली जात नाही. अधिकारीही ऐकत नाहीत. मी तुम्हाला १६ पत्रे दिली, पण त्याची दखल घेतली गेली नाही,’ अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघून केली. काही पत्रांच्या प्रतीही त्यांनी दाखविल्या. शिवसेनेचे दुसरे मंत्री रवींद्र वायकर यांनीही अधिकारी ऐकत नसल्याचा सूर लावला, असे सूत्रांकडून समजते.प्रत्येक बैठकीचा एक डेकोरम असतो, तो पाळला गेला पाहिजे. आपल्याला काही सांगायचे असेल, तर आपण मला नंतर भेटू शकता. इथे बोलणे उचित नाही, अशी समज मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दिल्याचे समजते. भाजपा-शिवसेना एकमेकांवर टीका करीत असले, तरी मंत्रिमंडळ त्या वादापासून दूर असून, आमच्यात समन्वय असल्याचे मुख्यमंत्री नेहमीच सांगत आले आहेत. त्याला आज तडा गेला.