शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

By admin | Updated: June 6, 2016 03:39 IST

ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहे. येत्या आठ दिवसांत विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

यदु जोशी,  मुंबईज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहे. येत्या आठ दिवसांत विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.खडसे यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे पर्याय नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, तर खडसेंवरून सध्या सुरू असलेल्या चर्चेचा रोख बदलण्यासही मदत होईल, असे म्हटले जात आहे. नव्या टीमसह मुख्यमंत्री जुलैमधील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सामोरे जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून यापूर्वीच परवानगी मिळाली आहे. विस्ताराबरोबर काही मंत्र्यांकडील खाती काढून ती नवीन मंत्र्यांना दिली जातील, तसेच सध्याच्या काही मंत्र्यांच्या खात्यात बदल केले जाऊ शकतात.मंत्रिमंडळाचे सध्याचे संख्याबळ मुख्यमंत्र्यांसह २९ इतके आहे. नियमानुसार, जास्तीत जास्त ४२ मंत्री करता येऊ शकतात. याचा अर्थ आणखी १३ जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यात शिवसेनेची दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या नऊपैकी मित्रपक्षांना दोन किंवा तीन मंत्रिपदे दिली जातील, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेकडून आणखी दोन मंत्रिपदे वाढवून मागितली जातील. मात्र, शिवसेनेचा कोटा वाढवून देण्याची भाजपाची सध्या तरी तयारी नाही. मंत्रिमंडळावर सध्या विदर्भाचा वरचष्मा आहे. मुख्यमंत्री, नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, वित्त, वने, सामाजिक न्याय आणि ऊर्जामंत्री पद विदर्भाकडे आहे. मात्र, त्यातही ही सगळी पदे पूर्व विदर्भाकडे आहेत. अमरावती विभागाला केवळ तीन राज्यमंत्री पदेच देण्यात आली आहेत. हे बघता पश्चिम विदर्भाला संधी दिली जाऊ शकते. मुंबई शहराकडे शिक्षण, गृहनिर्माण, कामगार, उद्योग, पर्यावरण, परिवहन, सार्वजनिक आरोग्य या खात्याची कॅबिनेट मंत्रिपदे आहेत. मुंबई पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला जादाचे स्थान मिळेल. पश्चिम महाराष्ट्राची नाराजी दूर करताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागणार आहे. खडसे यांच्याजागी जळगाव जिल्ह्यातून कोणाला संधी मिळते, याबाबत उत्सुकता आहे. हरीभाऊ जावळे यांचे नाव आघाडीवर आहे. नाशिकसारख्या मोठ्या जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेले नाही.