शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवेसाठी जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता

By admin | Updated: July 5, 2016 17:12 IST

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या ग्रीनफील्ड प्रकल्पाच्या निमित्ताने राज्यात प्रथमच लँड पूलिंग पद्धतीने जमीन अधिग्रहीत केली जाणार असून शेतकऱ्यांना या प्रकल्पात भागिदार करून घेतले जाणार असल्यामुळे जमीन अधिग्रहणाला विरोध होणार नाही, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.अंदाजे ३० हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग १० जिल्हे, २७ तालुके आणि ३५० गावांमधून जाणार आहे. याशिवाय हा महामार्ग कनेक्टरच्या माध्यमातून आणखी १४ जिल्हयांना जोडणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई अशा पाच विभागांना जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे १० हजार हेक्टर जमीन लागणार असून या महामार्गाच्या बाजूने २४ स्मार्ट सिटीज उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी आणखी १२ हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्वीकारलेल्या लँड पूलिंग पद्धतीनुसार अधिग्रहीत केल्या जाणाऱ्या बागायती जमिनीसाठी वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार असून जिरायती जमिनीसाठी ५० हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे. त्यात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होणार असून १० वर्षे हा मोबदला दिला जाईल. त्याचप्रमाणे, बागायती शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित जमीन, तर जिरायती शेतकऱ्यांना २५ टक्के विकसित जमीन १० वर्षांनंतर दिली जाणार आहे. या विकसित जमिनीला शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही, तर भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार जो मोबदला देय होईल, त्यावर १० वर्षांसाठी प्रतिवर्ष ९ टक्के व्याज या हिशेबाने जी रक्कम येईल, त्यानुसार सरकारने ती जमीन पुन्हा खरेदी करण्याची तरतूदही या प्रस्तावात आहे.महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे पूर्ण करण्याची जबाबदारी मा.मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळावर सोपविली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांचा आभारी आहे. महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गावर नेण्याचे काम हा महामार्ग करणार असल्यामुळे या महामार्गाचे नामकरणह्यमहाराष्ट्र समृद्धी महामार्गह्ण असे करण्यात येणार आहे. तसेच, महामार्गाच्या बाजूने ज्या स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत, त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला फायदा होणार असल्यामुळे या स्मार्ट सिटीजचे नामकरण ह्यकृषी समृद्धी केंद्रह्ण असे करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भागिदार करून घेणारे हे धोरण आहे. शेतकऱ्यांना १० वर्षे खात्रीशीर उत्पन्न मिळेल. शिवाय १० वर्षांनंतर विकसित जमीनही परत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध होणार नाही. या धोरणाला मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.