शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवेसाठी जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता

By admin | Updated: July 5, 2016 17:12 IST

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या ग्रीनफील्ड प्रकल्पाच्या निमित्ताने राज्यात प्रथमच लँड पूलिंग पद्धतीने जमीन अधिग्रहीत केली जाणार असून शेतकऱ्यांना या प्रकल्पात भागिदार करून घेतले जाणार असल्यामुळे जमीन अधिग्रहणाला विरोध होणार नाही, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.अंदाजे ३० हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग १० जिल्हे, २७ तालुके आणि ३५० गावांमधून जाणार आहे. याशिवाय हा महामार्ग कनेक्टरच्या माध्यमातून आणखी १४ जिल्हयांना जोडणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई अशा पाच विभागांना जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे १० हजार हेक्टर जमीन लागणार असून या महामार्गाच्या बाजूने २४ स्मार्ट सिटीज उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी आणखी १२ हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्वीकारलेल्या लँड पूलिंग पद्धतीनुसार अधिग्रहीत केल्या जाणाऱ्या बागायती जमिनीसाठी वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार असून जिरायती जमिनीसाठी ५० हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे. त्यात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होणार असून १० वर्षे हा मोबदला दिला जाईल. त्याचप्रमाणे, बागायती शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित जमीन, तर जिरायती शेतकऱ्यांना २५ टक्के विकसित जमीन १० वर्षांनंतर दिली जाणार आहे. या विकसित जमिनीला शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही, तर भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार जो मोबदला देय होईल, त्यावर १० वर्षांसाठी प्रतिवर्ष ९ टक्के व्याज या हिशेबाने जी रक्कम येईल, त्यानुसार सरकारने ती जमीन पुन्हा खरेदी करण्याची तरतूदही या प्रस्तावात आहे.महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे पूर्ण करण्याची जबाबदारी मा.मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळावर सोपविली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांचा आभारी आहे. महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गावर नेण्याचे काम हा महामार्ग करणार असल्यामुळे या महामार्गाचे नामकरणह्यमहाराष्ट्र समृद्धी महामार्गह्ण असे करण्यात येणार आहे. तसेच, महामार्गाच्या बाजूने ज्या स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत, त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला फायदा होणार असल्यामुळे या स्मार्ट सिटीजचे नामकरण ह्यकृषी समृद्धी केंद्रह्ण असे करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भागिदार करून घेणारे हे धोरण आहे. शेतकऱ्यांना १० वर्षे खात्रीशीर उत्पन्न मिळेल. शिवाय १० वर्षांनंतर विकसित जमीनही परत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध होणार नाही. या धोरणाला मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.