शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

उसाला बंदी !

By admin | Updated: September 1, 2015 00:59 IST

आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सरकारने धरणातील पाणीसाठे पाण्यासाठी राखीव ठेवले आहेत. याउपरही परिस्थिती गंभीर बनली तर ऊस लागवड आणि गाळपावर निर्बंध आणले जाऊ शकतात, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.दुष्काळाचा फटका बसलेल्या भागात ८६ साखर कारखाने असून तेथे नव्याने साखर कारखाना सुरु करण्यास तसेच उसाचे क्षेत्र वाढविण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम लोकांचे पिण्याचे पाणी, जनावरे व त्यानंतर शेती व औद्योगिक वापरासाठी पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे उसाच्या शेतीला खूप पाणी लागत असल्याने त्याच्या लागवडीवर निर्बंध आणण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)