शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

व्यापाऱ्यांचा आजपासून ‘बंद’

By admin | Updated: July 11, 2016 01:26 IST

फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे

पुणे : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मार्केट यार्डाबाहेर विकावा लागणार आहे. परंतु, शेतकरी स्वत: शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात असल्यास त्यांना विरोध केला जाणार नाही, अशी भूमिका अडते असोसिएशनने घेतली आहे.शासनाच्या या निर्णयाचा फटका गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांना बसणार असून या निर्णयाने बाजार आवाराबाहेरील व्यापाऱ्यांना सेस, अडत आणि इतर खर्चातून सूट देण्यात आली आहे. मात्र, मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेस, अडत, तोलाई, मापाई भरावीच लागणार आहे. शासनाचे हे धोरण व्यापारीविरोधी असल्याने रविवारी मार्केट यार्डातील शारदा गणपती मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.अडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, की शासनाने घेतलेला निर्णय शेतकरीविरोधी असून त्याचा फटका बाजारातील सर्व घटकांना बसणार आहे. शासनाचे नवीन धोरण तकलादू असून अधिक काळ चालणारे नाही. पूर्वापार चालत आलेली शेतीमाल विक्रीची परंपरा अचानक बदलता येणार नाही. ज्यांना कायद्यातील बदल नको आहे, असे शेतकरी आपला शेतीमाल बाजारात आणणारच नाहीत. ज्यांच्या नावावर सात/बारा आहे, अशा शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यास आमचा विरोध राहणार नाही. मार्केट यार्डात एक हजारांहून अधिक गाळे असून अनेक व्यापाऱ्यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून हे गाळे विकत घेतले आहेत. नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की मार्केट यार्डाच्या भिंतीच्या आत शेतीमाल विक्रीसाठी कडक नियमावली आणि या भिंतीच्या बाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. हे शासनाचे धोरण अन्यायकारक आणि चुकीचे आहे. सध्या सर्व व्यवहार इमानदारीने सुरू असून नवीन धोरणामुळे तो बेईमानीत सुरू होतील.बाजार सुरूच राहणार : दिलीप खैरे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असला तरीही सोमवारी बाजार सुरूच राहणार असून बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड येथे शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्यासाठी फळे, भाजीपाला विभागात एकूण १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटना आणि भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. बाजार समितीचे सर्व पदाधिकारी आणि सचिव सोमवारी येथे उपस्थित राहणार आहेत, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला शेतीमाल मार्केट यार्ड येथे विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले.