शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा आजपासून ‘बंद’

By admin | Updated: July 11, 2016 01:26 IST

फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे

पुणे : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मार्केट यार्डाबाहेर विकावा लागणार आहे. परंतु, शेतकरी स्वत: शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात असल्यास त्यांना विरोध केला जाणार नाही, अशी भूमिका अडते असोसिएशनने घेतली आहे.शासनाच्या या निर्णयाचा फटका गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांना बसणार असून या निर्णयाने बाजार आवाराबाहेरील व्यापाऱ्यांना सेस, अडत आणि इतर खर्चातून सूट देण्यात आली आहे. मात्र, मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेस, अडत, तोलाई, मापाई भरावीच लागणार आहे. शासनाचे हे धोरण व्यापारीविरोधी असल्याने रविवारी मार्केट यार्डातील शारदा गणपती मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.अडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, की शासनाने घेतलेला निर्णय शेतकरीविरोधी असून त्याचा फटका बाजारातील सर्व घटकांना बसणार आहे. शासनाचे नवीन धोरण तकलादू असून अधिक काळ चालणारे नाही. पूर्वापार चालत आलेली शेतीमाल विक्रीची परंपरा अचानक बदलता येणार नाही. ज्यांना कायद्यातील बदल नको आहे, असे शेतकरी आपला शेतीमाल बाजारात आणणारच नाहीत. ज्यांच्या नावावर सात/बारा आहे, अशा शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यास आमचा विरोध राहणार नाही. मार्केट यार्डात एक हजारांहून अधिक गाळे असून अनेक व्यापाऱ्यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून हे गाळे विकत घेतले आहेत. नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की मार्केट यार्डाच्या भिंतीच्या आत शेतीमाल विक्रीसाठी कडक नियमावली आणि या भिंतीच्या बाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. हे शासनाचे धोरण अन्यायकारक आणि चुकीचे आहे. सध्या सर्व व्यवहार इमानदारीने सुरू असून नवीन धोरणामुळे तो बेईमानीत सुरू होतील.बाजार सुरूच राहणार : दिलीप खैरे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असला तरीही सोमवारी बाजार सुरूच राहणार असून बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड येथे शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्यासाठी फळे, भाजीपाला विभागात एकूण १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटना आणि भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. बाजार समितीचे सर्व पदाधिकारी आणि सचिव सोमवारी येथे उपस्थित राहणार आहेत, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला शेतीमाल मार्केट यार्ड येथे विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले.