शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

विक्रमगडकरांना हवे हक्काचे बसस्थानक

By admin | Updated: January 7, 2017 03:10 IST

तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते.

विक्रमगड : तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते. नेमक्या बस असल्याने प्रवाशांना उन्हाळयात उन्हात तर पावसाळयात पावसात ताटकळत रहावे लागते.़ विक्रमगड हे तालुक्यातील मुख्य शहराचे ठिकाण असतांनाही येथे तालुका निमिर्तीपासुन बसस्थानक नाही त्यामुळे पिकअपशेडवर काम भागविले जात आहे़ या ठिकाणी अद्यायावत बसस्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेकवर्षापासून केली जात असतांनाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही़विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात असून शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे़ येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजीत ६० ते ७० एस़टी बसची सेवा आहे. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये बॅँका, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, आय़ टी़ आय व विविध आस्थापणांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस़ टी चे असंख्य प्रवासी असतात़ विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९५ गावपाडयांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव-खेडेपाडयातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगहुन एसटी बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणु आदीविध ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतांत़ मात्र तालुक्याचे मुख्यालय असुनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्यावत असे बसस्थानक नाही़ परिणामी प्रवाशांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ वृध्द, रुण, महिला प्रवासांसाठी प्रसाधगृहाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे मोठे हाल होतात. (वार्ताहर)>दुकानदारांचे अतिक्रमणएकंदरच मोठ्याप्रमाणात प्रवासी असतांना विक्रमगडमध्ये एसटी महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे. तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे़ कारण शेड समोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही़ तसेच अपुरी जागा असल्याने प्रवाशांना आजुबाजुला निवारा शोधावा लागतो. तसेच लगतच किरकोळ दुकानदारांनी दुकाने थाटल्याने प्रवाशांना उभे राहाण्यासाठी जागा शिल्लक राहात नाही़बसस्थानकाची मागणीगेल्या अनेक वर्षांपासून विक्रमगड येथे विना उपयोग पिकअप शेड आहे. किमान नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात आला असतांना व आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा हे येथील स्थानिक मतदार संघातील असल्याने त्यांनी तरी अशा बाबी लक्षात घेऊन या तालुक्याच्या मुख्यालयाच्या गावी अद्यायावत एस टी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.