शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांना हवे हक्काचे बसस्थानक

By admin | Updated: January 7, 2017 03:10 IST

तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते.

विक्रमगड : तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते. नेमक्या बस असल्याने प्रवाशांना उन्हाळयात उन्हात तर पावसाळयात पावसात ताटकळत रहावे लागते.़ विक्रमगड हे तालुक्यातील मुख्य शहराचे ठिकाण असतांनाही येथे तालुका निमिर्तीपासुन बसस्थानक नाही त्यामुळे पिकअपशेडवर काम भागविले जात आहे़ या ठिकाणी अद्यायावत बसस्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेकवर्षापासून केली जात असतांनाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही़विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात असून शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे़ येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजीत ६० ते ७० एस़टी बसची सेवा आहे. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये बॅँका, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, आय़ टी़ आय व विविध आस्थापणांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस़ टी चे असंख्य प्रवासी असतात़ विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९५ गावपाडयांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव-खेडेपाडयातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगहुन एसटी बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणु आदीविध ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतांत़ मात्र तालुक्याचे मुख्यालय असुनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्यावत असे बसस्थानक नाही़ परिणामी प्रवाशांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ वृध्द, रुण, महिला प्रवासांसाठी प्रसाधगृहाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे मोठे हाल होतात. (वार्ताहर)>दुकानदारांचे अतिक्रमणएकंदरच मोठ्याप्रमाणात प्रवासी असतांना विक्रमगडमध्ये एसटी महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे. तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे़ कारण शेड समोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही़ तसेच अपुरी जागा असल्याने प्रवाशांना आजुबाजुला निवारा शोधावा लागतो. तसेच लगतच किरकोळ दुकानदारांनी दुकाने थाटल्याने प्रवाशांना उभे राहाण्यासाठी जागा शिल्लक राहात नाही़बसस्थानकाची मागणीगेल्या अनेक वर्षांपासून विक्रमगड येथे विना उपयोग पिकअप शेड आहे. किमान नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात आला असतांना व आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा हे येथील स्थानिक मतदार संघातील असल्याने त्यांनी तरी अशा बाबी लक्षात घेऊन या तालुक्याच्या मुख्यालयाच्या गावी अद्यायावत एस टी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.