शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

बस, शाळा व इमारतींची दुरवस्था विधानसभेत

By admin | Updated: December 17, 2014 03:06 IST

आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

नागपूर : आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. कुणी बस, शाळा तर कुणी शासकीय इमारतींच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्णातील एसटी बसेसच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. एसटीमध्ये बसणे म्हणजे स्वत:चे हातपाय मोडून घेणे होय. अमरावतीमध्ये एकूण ४४३ एसटी बसेस सुरू आहेत. त्यापैकी १६९ बसेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. येथील बसेस १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक चालल्या असून ते मानकांपेक्षा अधिक आहे. एकट्या अचलपूर तालुक्यातच ३२ अपघात झाले आहेत. यात चार जणांचा मृत्यूसुद्धा झाला. बसेससंदर्भातही विदर्भाशी दुजाभाव केला जात आहे. चांगल्या बसेस पश्चिम महाराष्ट्राला दिल्या जात असून भंगार झालेल्या बसेस विदर्भाच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पश्चिम महाराष्ट्रात २२ टक्के तोट्यातील मार्गावरही बस चालविल्या जात आहेत. तर दुसरीकडे विदर्भात मात्र ८ टक्के तोट्यातील मार्गावरच बस चालवल्या जात आहेत. वाहनांची देखभाल दुरुस्ती सुद्धा प्रभावित झाली आहे, कारण एकूण ७७७ मंजूर पदांपैकी ३०० पदे रिक्त आहेत. एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम पडला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रकारे भाजपाचे सदस्य सरदार तारासिंह यांनी त्यांच्या मुलुंड येथील मतदारसंघात रात्री चालणाऱ्या बीअर बारचा मुद्दा उपस्थित केला. या बीअर बारमध्ये मुलींचे मृत्यू होत असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. बीअर बार रात्री ११ वाजता बंद व्हायला हवे़ परंतु रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहतात, असे लक्षात आणून दिले. शिवसेनेचे सदस्य डॉ. सुचित मिणचेकर यांनी पोलीस विभागातील महत्त्वाची शाखा असलेल्या फिंगर प्रिंट विभागाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना खाकी ड्रेस सुद्धा दिले जात नाही. या विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका शाळेद्वारा विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल करण्यापासून थांबवण्याची मागणी केली. प्रताप सरनाईक यांनी दहनघाट, सुनील शिंदे यांनी इमारतींची प्रश्न उपस्थित केला.