शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बस, शाळा व इमारतींची दुरवस्था विधानसभेत

By admin | Updated: December 17, 2014 03:06 IST

आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

नागपूर : आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. कुणी बस, शाळा तर कुणी शासकीय इमारतींच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्णातील एसटी बसेसच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. एसटीमध्ये बसणे म्हणजे स्वत:चे हातपाय मोडून घेणे होय. अमरावतीमध्ये एकूण ४४३ एसटी बसेस सुरू आहेत. त्यापैकी १६९ बसेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. येथील बसेस १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक चालल्या असून ते मानकांपेक्षा अधिक आहे. एकट्या अचलपूर तालुक्यातच ३२ अपघात झाले आहेत. यात चार जणांचा मृत्यूसुद्धा झाला. बसेससंदर्भातही विदर्भाशी दुजाभाव केला जात आहे. चांगल्या बसेस पश्चिम महाराष्ट्राला दिल्या जात असून भंगार झालेल्या बसेस विदर्भाच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पश्चिम महाराष्ट्रात २२ टक्के तोट्यातील मार्गावरही बस चालविल्या जात आहेत. तर दुसरीकडे विदर्भात मात्र ८ टक्के तोट्यातील मार्गावरच बस चालवल्या जात आहेत. वाहनांची देखभाल दुरुस्ती सुद्धा प्रभावित झाली आहे, कारण एकूण ७७७ मंजूर पदांपैकी ३०० पदे रिक्त आहेत. एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम पडला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रकारे भाजपाचे सदस्य सरदार तारासिंह यांनी त्यांच्या मुलुंड येथील मतदारसंघात रात्री चालणाऱ्या बीअर बारचा मुद्दा उपस्थित केला. या बीअर बारमध्ये मुलींचे मृत्यू होत असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. बीअर बार रात्री ११ वाजता बंद व्हायला हवे़ परंतु रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहतात, असे लक्षात आणून दिले. शिवसेनेचे सदस्य डॉ. सुचित मिणचेकर यांनी पोलीस विभागातील महत्त्वाची शाखा असलेल्या फिंगर प्रिंट विभागाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना खाकी ड्रेस सुद्धा दिले जात नाही. या विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका शाळेद्वारा विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल करण्यापासून थांबवण्याची मागणी केली. प्रताप सरनाईक यांनी दहनघाट, सुनील शिंदे यांनी इमारतींची प्रश्न उपस्थित केला.