शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

गरिबांच्या ‘संजीवनी’ला आगीचा विळखा

By admin | Updated: October 22, 2014 00:58 IST

अन्न-वस्त्र-निवारानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा

जेनेरिक औषध खाक : जनतेच्या आर्थिक बळाची गरजनागपूर : अन्न-वस्त्र-निवारानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत व्हावी म्हणून जनमंचने नागपुरात पहिले जेनेरिक्स औषधे उपलब्ध करून महत्त्वाची सेवा सुरू केली. जेनेरिक्स औषधे गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ‘संजीवनी’च ठरली. मात्र सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गरिबांची ही ‘संजीवनी’ जळून खाक झाली़ तब्बल साडेसात लाखांचे नुकसान झाले. जनमंचला आता आर्थिक बळाची गरज आहे. हे बळ लाभले तरच गरिबांना पुन्हा ही औषधे पुरविणे शक्य होणार आहे़महागड्या औषधांमुळे रुग्णाचा जीव मेटाकुटीला येतो. यातून मार्ग काढण्यासाठी जनमंचने मार्च २०१३ मध्ये पुढाकार घेत धरमपेठमधील झेंडा चौकात जेनेरिक्स औषध दुकान सुरू केले. जनमंचचा नागपुरातील या पहिल्याच प्रयोगाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. परंतु दुकानाला लागलेल्या आगीमुळे या सेवेत खंड पडला. आज दोनशेच्यावर रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यातील अनेकांनी हे संकट जनमंचसोबतच आमच्यावरही कोसळल्याची भावनाही बोलून दाखविली. या विषयी अधिक माहिती देताना जनमंचचे प्रभाकर खोंडे आणि प्रल्हाद करसने यांनी सांगितले, सोमवारी रात्री ९.३० वाजता दुकान बंद केले. त्याच रात्री १० वाजताच्या सुमारास दुकानासमोरील विद्युत खांबावर विद्युत जोडणीचे काम सुरू होते. अचानक विद्युत दाब वाढला. बहुतेक यामुळेच दुकानात शॉर्टसर्किट झाले असावे. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दुकानाच्या व्हेंटिलेटरमधून धूर बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला आणि जनमंचच्या सदस्यांना याची माहिती दिली. परंतु मदत पोहचेपर्यंत औषधांसह संगणक, पंखे, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले.आता एवढी मोठी रक्कम पुन्हा उभे करणे हे आमच्यासमोर आव्हान आहे. मात्र यात जनतेने आर्थिक मदत केल्यास गरजू रुग्णांसाठी असलेली ही सेवा लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)