शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रिक्षा दिसल्यास जाळून टाका!

By admin | Updated: March 10, 2016 04:05 IST

केवळ एका उद्योगपतीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र दडल्याचे दिसते त्यामुळे नव्या रिक्षा रस्त्यावर आल्यावर थेट जाळून टाका

मुंबई : केवळ एका उद्योगपतीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र असून यात मोठे अर्थकारण दडल्याचे दिसते त्यामुळे नव्या रिक्षा रस्त्यावर आल्यावर थेट जाळून टाका, असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना देऊन पुन्हा तोडफोडीचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सूचविले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दशकपूर्ती सोहळा येथील षणमुखानंद सभागृहात झाला. मराठी मुलांनाच रिक्षा, टॅक्सीचे परवाने मिळाले पाहिजे. अर्थात केवळ मराठी आली म्हणजे परवाना देऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले. ७० हजार रिक्षांचे ७० टक्के परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या आणि भाजपाच्या राज्यात फारसा फरक दिसत नाही,असे ते म्हणाले. फार काही बदलले नसेल तर मग काँग्रेसवालचे चांगले होते, असा टोलाही त्यांनी लगावला. मनातले सर्व ८ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बोलेन, असे सांगत त्यांनी काही मुद्दे राखून ठेवले. बजाज कंपनीत ७० हजार रिक्षा तयार आहेत. रोज तीन हजार रिक्षा परवाने देण्याचे आदेश देण्यात आले आहे. बजाज कंपनीसोबत ७० हजार रिक्षांसाठी १,१९० कोटींचा व्यवहार होणार आहे, असा आरोप त्यांनी केला. नवीन परवाना असलेल्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर चालक आणि प्रवाशांना बाहेर काढून त्या जाळायच्या. नवीन परवाना असलेल्याच रिक्षा जाळायच्या, नाहीतर जातानाच रिक्षा जाळायला सुरूवात कराल, असेही ते म्हणाले.> सत्ताधारी खोटं बोलून सत्तेवर आले. आताही ते लोकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. काँग्रेसच्या काळात सराफांना भाजपाने पाठिंबा दिला, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर कर लादला, अशी टीका त्यांनी केली. रस्त्यावरील होर्डिंग काढणे योग्य आहे, मात्र महापालिकेच्या जागेवरील होर्डिंग राजकीय कार्यकर्त्यांना परवडत आहेत का, हे पाहण्याची जबाबदारीही न्यायालयाची आहे. न्यायाधीश असणे म्हणजे मोगलाई नाही. प्रत्येक गोष्टींत त्यांनी नाक खूपसण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यापासून सर्वांच्या आयुष्यात ‘बॅडपॅच’ होता. लतादीदी सोडून सगळ््यांना अपयश आले. पक्षाच्या १० वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार आले. चढ-उतार येतातच. आपल्यालाच आपला उद्धार करावा लागेल, असेही मार्गदर्शन त्यांनी केले.