शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

जिल्हा रूग्णालयांवरच ‘स्वाईन’चा भार

By admin | Updated: March 11, 2015 01:36 IST

औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे

औरंगाबाद : औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य केंद्रे उघडण्यात आली असली तरी पुरेशा सुविधांअभावी औरंगाबाद जिल्ह्याचा भार ‘घाटी’वर तर इतर ठिकाणी जिल्हा रूग्णांवरच ताण पडला आहे.औरंगाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लूने जानेवारीपासून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ४६ पेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व महापालिका केंद्रात केवळ प्राथमिक तपासणीचेच काम होत आहे. ग्रामीण भागातील एकाही शासकीय रुग्णालयात किंवा मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचाराची सोय उपलब्ध नाही. घाटी रुग्णालयातील स्वाईन फ्लूच्या वार्डात सध्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघे पॉझिटिव्ह असून उर्वरित रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एम. गायकवाड यांनी तीन उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र वार्ड केल्याचे सांगितले. ‘स्वाईन फ्लू’ने एकट्या लातूर जिल्ह्यात १३ बळी गेले आहेत. जिल्ह्यात संशयित म्हणून दाखल झालेल्या २२१ पैकी १७९ जणांचे स्वॅब पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यातील ४९ जणांना ‘स्वाईन’ झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अद्यापतही तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व रुग्ण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे़ महिनाभरात ३० जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत़ सध्या जिल्हा रूग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयासह तुळजापूर, उमरगा व परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे़ बीडमध्ये एक रुग्ण दगावला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत आहे. १२ फेबु्रवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या सातपर्यंत वाढत गेली. आतापर्यंत सुमारे ५३ जणांचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ नमुने पॉझिटिव्ह तर चार नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. (प्रतिनिधी)