शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींना दणका

By admin | Updated: January 12, 2015 03:38 IST

अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली

मुंबई : अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली आहे. दखल घेण्यात आलेल्या ११३ जाहिरातींपैकी ६१ जाहिराती वैयक्तिक आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील होत्या; तर त्यापाठोपाठ ३३ जाहिराती शिक्षण क्षेत्रातील होत्या. आरोग्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने किंवा सेवांच्या ५८ जाहिरातदारांच्या जाहिरातीबाबतच्या दाव्यांमध्ये ग्राहक तक्रार कौन्सिलला त्या एकतर गैरसमज करून देणाऱ्या किंवा वैज्ञानिक सबळ नसलेल्या आणि एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आढळल्या. काही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींनी औषधे आणि जादूटोणाविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही दिसून आले आहे. या जाहिरातींविरोधातील तक्रारींची दखल घेण्यात आली आहे.ग्राहक तक्रार कौन्सिलला ३३ शैक्षणिक क्षेत्रातील विविध जाहिरातदारांच्या जाहिरातींबाबतचे दावे सिद्ध झाले नसल्याचे आढळले. त्यामुळे एएससीआयच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या जाहिरातींविरोधातील तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. (प्रतिनिधी)