शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

डोंगर पोखरून आदिवासी वाडीत बांधल्या चाळी

By admin | Updated: October 3, 2016 03:13 IST

कल्याण राज्यमार्गापासून काहीच अंतरावर आदिवासी लोकवस्ती आहे.

कांता हाबळे,नेरळ - कल्याण राज्यमार्गापासून काहीच अंतरावर आदिवासी लोकवस्ती आहे. ही जमीन आदिवासी बांधवांची असली तरी गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बिगर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी १०० हून अधिक चाळी उभारण्यात आल्या असून बिगर आदिवासी लोक याठिकाणी वास्तव्य करीत आहे. नेरळ परिसरातील डोंगर फोडून या बैठ्या चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टीत त्यांना धोका उद्भवू शकतो. इतक्या मोठ्या संख्येने याठिकाणी चाळी बांधण्यात आल्या असल्या तरी महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादीदुर्घटना झाल्याच जबाबदारी कोण, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. आदिवासींच्या जमिनीवर बैठ्या चाळी बांधून त्या बिगर आदिवासी लोकांना विकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी नेरळ शहर वसलेले आहे. येथील पावसाची सरासरी साधारण ४००० मिलीमीटर एवढी असून डोंगरात खोदकाम केल्यास काही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहाचीवाडीत आदिवासी जमिनीवर बैठ्या चाळी बांधण्यासाठी लाल मातीचा डोंगर फोडण्यात आला. उभ्या असलेल्या चाळीतील बिगर आदिवासी लोक वास्तव्य करीत आहेत. नेरळ जवळील मोहाचीवाडीला लागून कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली आहे. संबंधित बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून घेतली व तेथे चाळी बांधण्यास सुरु वात केली. नेरळ ग्रामपंचायतीने त्यांना घरपट्टी आणि असेसमेन्ट उतारे दिले आहेत. गतवर्षी याच भागात घराची भिंत कोसळून पाच जणांचे बळी गेले होते. असे असताना डोंगर पोखरून बांधलेल्या चाळी किती सुरक्षित आहेत, अशी विचारणा आदिवासी बांधवांकडून नेरळ ग्रामपंचायतीने विचारण्यात येत आहे. डोंगर पोखरून चाळ बांधल्यानंतर दरडीपासून संरक्षणासाठी चार फुटाची संरक्षण भिंत उभारण्यात आली असली तरी हा प्रयत्न तकलादू असून अतिवृष्टीत माळीणसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती येथील नागरिकांना आहे. 12आदिवासी वाड्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आहे. मोहाचीवाडीला लागून असलेल्या कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन विकसित करण्यासाठी दिली.बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून चाळी बांधण्यास सुरु वात केली. >जमीन केवळ विकसित करण्यासाठी दिली आहे. याठिकाणी चाळी बांधल्या आणि त्यात बिगर आदिवासी लोक राहायला आले. मात्र तरीही जमिनीचा मूळ मालक म्हणून आपणच कायम राहणार आहोत. डोंगराच्या पायथ्याशी चाळी असल्या तरी कोणताही धोका वाटत नाही. - कविता शिंगवा, आदिवासी जमीन मालक>आदिवासींच्या जमिनीवर चाळी बांधल्या असल्या तरी जमीन आदिवासी व्यक्तीच्या नावावर आहे. ग्रामपंचायतीने त्यांना असेसमेंट आणि कराची पावती दिली आहे. परंतु पाणी, रस्ता आणि दिवाबत्ती अशा सुविधा ग्रामपंचायतीने दिल्या नाहीत. - पी. जी. गाडेकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ