शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

डोंगर पोखरून आदिवासी वाडीत बांधल्या चाळी

By admin | Updated: October 3, 2016 03:13 IST

कल्याण राज्यमार्गापासून काहीच अंतरावर आदिवासी लोकवस्ती आहे.

कांता हाबळे,नेरळ - कल्याण राज्यमार्गापासून काहीच अंतरावर आदिवासी लोकवस्ती आहे. ही जमीन आदिवासी बांधवांची असली तरी गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बिगर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी १०० हून अधिक चाळी उभारण्यात आल्या असून बिगर आदिवासी लोक याठिकाणी वास्तव्य करीत आहे. नेरळ परिसरातील डोंगर फोडून या बैठ्या चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टीत त्यांना धोका उद्भवू शकतो. इतक्या मोठ्या संख्येने याठिकाणी चाळी बांधण्यात आल्या असल्या तरी महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादीदुर्घटना झाल्याच जबाबदारी कोण, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. आदिवासींच्या जमिनीवर बैठ्या चाळी बांधून त्या बिगर आदिवासी लोकांना विकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी नेरळ शहर वसलेले आहे. येथील पावसाची सरासरी साधारण ४००० मिलीमीटर एवढी असून डोंगरात खोदकाम केल्यास काही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहाचीवाडीत आदिवासी जमिनीवर बैठ्या चाळी बांधण्यासाठी लाल मातीचा डोंगर फोडण्यात आला. उभ्या असलेल्या चाळीतील बिगर आदिवासी लोक वास्तव्य करीत आहेत. नेरळ जवळील मोहाचीवाडीला लागून कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली आहे. संबंधित बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून घेतली व तेथे चाळी बांधण्यास सुरु वात केली. नेरळ ग्रामपंचायतीने त्यांना घरपट्टी आणि असेसमेन्ट उतारे दिले आहेत. गतवर्षी याच भागात घराची भिंत कोसळून पाच जणांचे बळी गेले होते. असे असताना डोंगर पोखरून बांधलेल्या चाळी किती सुरक्षित आहेत, अशी विचारणा आदिवासी बांधवांकडून नेरळ ग्रामपंचायतीने विचारण्यात येत आहे. डोंगर पोखरून चाळ बांधल्यानंतर दरडीपासून संरक्षणासाठी चार फुटाची संरक्षण भिंत उभारण्यात आली असली तरी हा प्रयत्न तकलादू असून अतिवृष्टीत माळीणसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती येथील नागरिकांना आहे. 12आदिवासी वाड्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आहे. मोहाचीवाडीला लागून असलेल्या कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन विकसित करण्यासाठी दिली.बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून चाळी बांधण्यास सुरु वात केली. >जमीन केवळ विकसित करण्यासाठी दिली आहे. याठिकाणी चाळी बांधल्या आणि त्यात बिगर आदिवासी लोक राहायला आले. मात्र तरीही जमिनीचा मूळ मालक म्हणून आपणच कायम राहणार आहोत. डोंगराच्या पायथ्याशी चाळी असल्या तरी कोणताही धोका वाटत नाही. - कविता शिंगवा, आदिवासी जमीन मालक>आदिवासींच्या जमिनीवर चाळी बांधल्या असल्या तरी जमीन आदिवासी व्यक्तीच्या नावावर आहे. ग्रामपंचायतीने त्यांना असेसमेंट आणि कराची पावती दिली आहे. परंतु पाणी, रस्ता आणि दिवाबत्ती अशा सुविधा ग्रामपंचायतीने दिल्या नाहीत. - पी. जी. गाडेकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ