शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

गावांतील बांधकामेही नियमित

By admin | Updated: March 23, 2016 04:10 IST

शहरी भागातील अनधिकृत बांधकाने नियमित करण्याचे धोरण आणल्यानंतर आता राज्य सरकार ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या विचारात आहे.

मुंबई : शहरी भागातील अनधिकृत बांधकाने नियमित करण्याचे धोरण आणल्यानंतर आता राज्य सरकार ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या विचारात आहे. या संबंधीचे धोरण लवकरच आणले जाणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. महसूल विभागाच्या मालकीच्या जागा लीजवर घेऊन त्यावर गृहनिर्माण प्रकल्प उभारलेल्या गृहनिर्माण संस्थांना आता संबंधित जमिनीची मालकी दिली जाईल. त्यासाठी रेडीरेकनरनुसार किंवा शासन ठरवून देईल, त्या दरानुसार गृहनिर्माण संस्थांकडून शुल्क आकारले जाईल. या संबंधीचे विधेयक लवकरच सादर केले जाईल, असेही खडसे यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्थांना लीजवर दिलेल्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ही बांधकामे आता पाडणे शक्य नाही. लीजचे नूतनीकरण करावेच लागते. मात्र, संबंधित जमिनीबाबत कोणत्याही परवानगीसाठी गृहनिर्माण संस्थांना राज्य सरकारकडे यावे लागते. यावर उपाय म्हणून संबंधित निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातही काही जागा या विशिष्ट कामासाठी आरक्षित ठेवलेल्या असतात. त्यावरील बांधकामे नियमित करता येणार नाहीत. मात्र, आरक्षणे नसतील, अशा जागांवरही रेडीरेकनर दराने रक्कम भरून घेऊन बांधकामे नियमित करून घेण्याचे धोरण आखले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बालाजी किणीकर, रूपेश म्हात्रे आदींनी लक्षवेधी सूचना मांडत अंबरनाथ येथील सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीत खरेदी, विक्री आणि हस्तांतरण व्यवहार गेल्या १२ वर्षांपासून बंंद असल्याकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर खडसे यांनी सांगितले की, ‘सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीला निवासी प्रयोजनासाठी काही अटी व शर्तींवर जागा देण्यात आली आहे. सदर संस्थेच्या काही सदस्यांनी शासनाची पूर्व परवानगी न घेता, त्यांची निवासी बांधकामे काढून त्यावर बहुमजली इमारतीचे बांधकाम केले व त्यातील सदनिकांची विक्री करून काही दुकाने, मंगल कार्यालये, बँका असा वाणिज्यिक वापर सुरू केला. नियमांचा भंग केल्यास बाजारमूल्याच्या ७५ टक्के रक्कम आकारून नियमानुकूल करता येते. पण यासाठी नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)