शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर्सनी वाचला समस्यांचा पाढा

By admin | Updated: May 18, 2016 02:45 IST

प्रशासन अत्यंत धीम्या गतीने काम करीत असून विकासकामे जवळपास ठप्प झाली आहेत

नवी मुंबई : नैना परिसरात बांधकाम परवानगी वेळेत मिळत नाही. प्रशासन अत्यंत धीम्या गतीने काम करीत असून विकासकामे जवळपास ठप्प झाली आहेत. येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने त्या सोडविण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ हाऊसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय)च्या नवी मुुंबई कार्यकारिणीने केली आहे. एमसीएचआय च्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांची भेट घेतली. यावेळी नैना परिसरातील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. २७० गावांचा समावेश नैना मध्ये आहे. तीन वर्षांमध्ये पूर्ण परिसराचा विकास आराखडा तयार करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यातच हा कालावधी संपला असून, अद्याप अंतिम आराखड्याला शासनाची मंजुरी मिळालेली नाही. पहिल्या दीड वर्षात सिडकोने एकाही प्रकल्पाला परवानगी दिली नव्हती. पुढील दीड वर्षात फक्त २९ प्रकल्पांना परवानगी दिली आहे. एमएमआरडीएच्या मुदत संपलेल्या विकास आराखड्याच्या नकाशावर आधारित परवानग्या दिल्या जात आहेत. परंतु त्या आराखड्यामध्ये निवासी झोन फक्त ०.३५ टक्के एवढाच होता. परवानगीच मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नियमावली तयार करताना २ ते ६ पट विकास शुल्क आकारले जात आहे. प्रति हेक्टरला २ कोटी ८१ लाख एवढे शुल्क आकारले जात आहे. हा नकाशा तयार करताना ९० टक्के रहिवासी क्षेत्रामध्ये रस्ते, लाइट, पाणी व मलनिस्सारण व्यवस्था करून दिलेली नाही. नैनाच्या विकास आराखड्यावर ३९४६ सूचना व हरकती आल्या होत्या, परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने त्यांच्या इच्छेप्रमाणे आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला असल्याचेही निदर्शनास आणून दिले. सिडको कार्यक्षेत्रामध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गतचे भूखंड वाटप थांबविण्यात आले आहे. बांधकाम परवानगी मिळविणे किचकट झाले आहे. सिडकोने सीआरझेड, मँग्रोव्हजमधील भूखंड बदलून द्यावेत. बांधकाम परवानगीसाठीच्या ना हरकत परवान्यांची संख्या कमी केली जावी. सिडकोमधील अधिकाऱ्यांशी भेटण्याच्या वेळेमध्ये वाढ करावी. अनेक वेळा भेटण्यासाठी दिलेल्या वेळेत अधिकारी जागेवरच नसतात. यामुळे अनेक कामे रखडत असल्याचे यावेळी एमसीएचआयचे चेअरमन अरविंद गोयल यांनी निदर्शनास आणून दिले. गगरानी यांनीही या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश बाविस्कर, विजय लखानी, मनोहर श्रॉफ, सरेंदर अरेंजा, जितेंद्र परमार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)