शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पदाधिका-यांना हाताशी धरून बिल्डरचा खेळ,सह्यांना रहिवाशांनी दर्शविला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:21 IST

एमपी मिल कंपाउंडच्या विकासकाने पदाधिका-यांना हाताशी धरून, रहिवाशांशी खेळ केल्याचेही समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमपी मिल कंपाउंडच्या विकासकाने पदाधिका-यांना हाताशी धरून, रहिवाशांशी खेळ केल्याचेही समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी विकासकाने एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांची बदली होणार असल्याचे सांगत, २२५ चौरस फुटांच्या बदल्यात २६९ चौरस फुटांच्या सदनिका मिळाव्यात, म्हणून पत्रावर सह्या करण्याचे आवाहन केले होते. मात्र, रहिवाशांनी प्रस्ताव फेटाळून लावला.बिल्डरच्या या आवाहनाला विरोध करत, रहिवाशांनी ठोस प्रस्तावाची मागणी करत सह्या करण्यास नकार दिला. तरीही गृहनिर्माण संस्थांमधील काही पदाधिकाºयांना हाताशी धरून, बिल्डरने एकूण १३ विंगमधल्या ६ विंगमधील काही रहिवाशांच्या सह्या घेतल्या. एमपी मिल कंपाउंडमधील १६ मजली बी-२-डी सिंहगड या इमारतीमधील २२५ चौरस फुटांच्या १२ सदनिका बाहेरून वाढवून, २६९ चौरस फुटांच्या केल्या. त्यावरील मजल्यांवरील सदनिका वाढविण्याचे काम सुरू आहे. गेल्या १० वर्षांपासून रहिवाशी वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सदनिकांमध्ये अशा प्रकारे बदल करण्याची परवानगी दिलीच कोणी, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला. या प्रकरणी महेता यांच्यासह बिल्डर आणि संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयाच्या चौकशीची मागणी आता होत आहे.एमपी मिल कंपाउंडमधील वस्तुस्थिती-युती सरकार आल्यानंतर मुंबईत घोषित झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील हा पहिलाच प्रकल्प आहे.या ठिकाणच्या एमपी मिल कंपाउंड, जनता हिल, जायफळवाडी, जनतानगर, पोलीस कँप यांचा एकत्रित पुनर्विकास या प्रकल्पात करण्यात येणार होता.एकूण २ हजार३३४ झोपड्या पात्र ठरल्या. त्यातील एमपी मिल कंपाउंडमधील झोपड्यांची संख्या १,८०० इतकी होती.पुनर्वसनाची प्रतीक्षाएमपी मिल कंपाउंडमधील १५०, तर जनता हिलमधील ११० रहिवाशी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून रहिवाशांमध्ये असंतोष आहे.राजरोसपणे काम सुरूएमपी मिल कंपाउंडमधील १६ मजली बी-२-डी सिंहगड या इमारतीमधील २२५ चौरस फुटांच्या १२ सदनिका बाहेरून वाढवून, २६९ चौरस फुटांच्या केल्या. मजल्यांवरील सदनिका वाढविण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.1996 साली प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यानुसार, पात्र झोपडीधारकांना २२५ चौरस फुटांची घरे देण्यात येणार होती.2000 सालापासून २०११ सालापर्यंत एकूण १ हजार ६५० झोपडीधारकांचे २२५ चौरस फुटांच्या घरांत पुनर्वसन करण्यात आले.2008 साली राज्य सरकारने झोपू योजनेअंतर्गत २६९ चौरस फुटांची घरे देणाºया निर्णयाची घोषणा केली, तरीही २००८ सालानंतर पुनर्वसित झालेल्या पात्र सदनिकाधारकांना २२५ चौरस फुटांची घरे देण्यात आली.