शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक उभारू

By admin | Updated: February 20, 2016 01:04 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.

आपटाळे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिवनेरभूषण पुरस्कार डॉ. मनोहर डोळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्ष राणी शेळकंदे, पंचायत समिती सभापती संगीता वाघ आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘गेली पंधरा वर्षे छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात करू, अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र छत्रपतींच्या विचाराने चालणारे आमचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाबाबतच्या सर्व परवानग्या आम्ही घेतल्या. या कामाचे टेंडर काढले आहे. लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येणार आहे.’’ छत्रपती शिवरायांनी जनतेला स्वाभिमानाने जगण्यास शिकविले. सामान्य माणसांचे रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श घेऊन आम्ही राज्यकारभार करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वप्नातील राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेतुन आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे.’’ भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, तो छत्रपतींच्या दूरदृष्टीतून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करू, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जनतेने विश्वासाने आमच्या हातात सत्ता दिली आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.शिवनेरी ते लेण्याद्री रोपवे, पर्यटनासाठी चालना मिळावी. या परिसरात ४५० लेण्या आहेत, त्यांचे संवर्धन व्हावे, जुन्नर तालुक्यातील सात किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आराखडा तयार करा. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही ते म्हणाले