शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक उभारू

By admin | Updated: February 20, 2016 01:04 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.

आपटाळे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिवनेरभूषण पुरस्कार डॉ. मनोहर डोळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्ष राणी शेळकंदे, पंचायत समिती सभापती संगीता वाघ आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘गेली पंधरा वर्षे छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात करू, अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र छत्रपतींच्या विचाराने चालणारे आमचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाबाबतच्या सर्व परवानग्या आम्ही घेतल्या. या कामाचे टेंडर काढले आहे. लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येणार आहे.’’ छत्रपती शिवरायांनी जनतेला स्वाभिमानाने जगण्यास शिकविले. सामान्य माणसांचे रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श घेऊन आम्ही राज्यकारभार करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वप्नातील राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेतुन आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे.’’ भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, तो छत्रपतींच्या दूरदृष्टीतून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करू, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जनतेने विश्वासाने आमच्या हातात सत्ता दिली आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.शिवनेरी ते लेण्याद्री रोपवे, पर्यटनासाठी चालना मिळावी. या परिसरात ४५० लेण्या आहेत, त्यांचे संवर्धन व्हावे, जुन्नर तालुक्यातील सात किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आराखडा तयार करा. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही ते म्हणाले