शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

कामगारांसाठी राज्यात ५ लाख घरे बांधणार

By admin | Updated: March 24, 2017 01:52 IST

राज्यातील औद्योगिकीकरणाला चालना देताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

नवी मुंबई : राज्यातील औद्योगिकीकरणाला चालना देताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. कष्टकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. २०१९ पर्यंत राज्यातील कामगारांसाठी तब्बल ५ लाख घरे उलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मुंबई एपीएमसीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कामगारमंत्र्यांनी माथाडींचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करून महामंडळाला २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय या योजनांच्या लाभासाठी उत्पन्नाची अट ४५ हजार रुपयांवरून ६ लाख रुपये करण्यात आली आहे. माथाडी बोर्डाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती पुढील ९० दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल. बोर्डामध्ये कर्मचारी भरती करताना कामगारांच्या मुलांनाच प्राधान्य देण्यात येईल. माथाडी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तर, माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला माजी मंत्री गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.