शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राज्यात ११ लाख घरे बांधणार

By admin | Updated: July 6, 2015 00:53 IST

रवींद्र वायकर यांची माहिती : शिवाजी विद्यापीठाच्या निधीचा प्रश्न सोडवू

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार राज्यातील गोरगरिबांना परवडणारी अकरा लाख घरे बांधून देणार असल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी विद्यापीठाचा प्रलंबित सुवर्णमहोत्सवी निधीबाबत प्रस्ताव आलेला नाही, आल्यानंतर तो निश्चितच सोडवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रवींद्र वायकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा निर्धार केला आहे. जुन्या गृहनिर्माण धोरणांत बदल केला असून झोपडपट्टी होणार नाहीत, ‘म्हाडा’च्या माध्यमातून गरिबांसाठी अकरा लाख घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. उच्चशिक्षण विभागातील जवळपास ५१ हजार जागा शिल्लक आहेत. त्याला विनाअनुदानित कॉलेजची संख्या जबाबदार आहे. शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्ष निधीचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, आल्यानंतर तत्काळ सोडवू. भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत विचारणा केली असता, भाजप वेगळा पक्ष आहे, त्यांची धोरणे वेगळी आहेत. संबंधित मंत्र्यांवर अजून दोषारोप सिद्ध झालेला नाही, त्यांच्याबाबत भाजपच स्पष्टीकरण देईल, असेही वायकर यांनी सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘प्रभाग तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ उपक्रम राबविला आहे, त्यामुळे महापालिकेवर भगवा निश्चितच फडकेल. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)वर्गवाढीस बंदी चुकीचीतंत्रविभागाच्या जागा रिक्त राहतात, म्हणून नवीन वर्ग व कॉलेज यांना परवानगी नाकारली जाते. हे योग्य नाही, वाणिज्य व सायन्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने त्यांची संख्या वर्षाला वाढत आहे. यासाठी उच्चशिक्षण विभागाच्या वर्गवाढीस सरसकट बंदी घालणे चुकीचे असून याबाबत मुख्यमंत्री, तंत्रशिक्षण मंत्री व सचिवांशी चर्चा झाल्याचे वायकर यांनी सांगितले.पक्षप्रमुखच बक्षीस देतीलआमदार राजेश क्षीरसागर यांनी भगव्या सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी शहरात आक्रमकपणे काम केल्याचे राज्यमंत्री वायकर यांनी सांगितले. त्यावर त्यांना शाबासकी कधी देणार, असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्याकडे वरिष्ठांचे लक्ष आहे, त्यांचे कार्य पाहून त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चितच बक्षीस देतील, असे वायकर यांनी सांगितले.