शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे सांगत मुनगंटीवारांनी मांडला अर्थसंकल्प

By admin | Updated: March 18, 2016 14:27 IST

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थयसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे सांगत शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असल्यांच मुंनगंटीवारांनी सांगितलं

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई,दि. १८ - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थयसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे सांगत शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असल्यांच मुंनगंटीवारांनी सांगितलं. अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा असल्यांच सांगत हा अर्थसंकल्प शेतक-यांना समर्पित करत असल्याचं मुनगंटीवार बोलले. कृषीक्षेत्रासाठी  25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून 2016 - 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देत आपलं सरकार शेतक-यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याची हमी मुनगंटीवारांनी दिली.  
 
जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली आहे. शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद असून १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारंपारिक तंटे मिटवण्यासाठी पाणंद रस्ता योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली.  
 
शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्प व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मत्स्यसंवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असून कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं.