शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भावाची तफावत : पणन महासंघाच्या बंडीत टाकले नाही एकही बोंड

By admin | Updated: November 17, 2016 20:24 IST

यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठखामगाव, (जि.बुलडाणा) : यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कापसाच्या भावात तफावत असल्याने पणन महासंघाची आतापर्यंत कापूस खरेदी झालीच नाही.

राज्यात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने कापूस खरेदी करण्यात येते. पुर्वी दिवाळीच्या अगोदरच हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू होत असून यावर्षी ४ हजार १६० रूपये हमीभावाने कापूस खरेदी पणन महासंघाकडून ठरविली आहे. जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र आहेत. यावर्षी १५ नोव्हेंबरला जिल्ह्यात केवळ जळगाव जामोद केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी काटापूजन केले. मात्र येथे कापूस खरेदीसाठी आला नाही. तीन दिवसाचा कालावधी उलटूनही एकही बोंडाची कापूस खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या केंद्राकडे पाठ फिरविली आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४८०० रूपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघापेक्षा जादाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी व्यापाऱ्यांना पसंती दिली आहे. (शहर प्रतिनिधी)गतवर्षी ७ हजार क्विंटल कापूस खरेदीपणन महासंघाच्यावतीने गतवर्षी जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा या तीन केंद्रावर कापूस खरेदी करण्यात आली होती. गतवर्षी कापसाला ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटल भाव होता. तीनही केंद्रावर ७ हजार १०० क्विंटल कापूस खरेदी केली होती. यावर्षी शासनाने केवळ ६० रूपये कापसाची भाववाढ करून ४१६० रूपये प्रति क्विंटल हमीदर ठरविला आहे.