शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
4
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
5
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
6
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
7
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
8
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
9
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
10
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
11
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!
12
सर्पदंशाने १९ वेळा मृत्यू झालेला शेतकरी सापडला जिवंत, म्हणाला, आता मी....  
13
केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरा, स्काल्पला होतील भरपूर फायदे
14
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
15
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
16
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
17
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
18
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
19
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
20
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

बालगृहांची रसद तोडली; रेशनिंगच्या धान्याचा पुरवठा बंद

By admin | Updated: January 17, 2016 02:58 IST

राज्यातील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेले असतानाच राज्य शासनाने बीपीएल दराने वितरित करण्यात

मुंबई : राज्यातील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेले असतानाच राज्य शासनाने बीपीएल दराने वितरित करण्यात येणाऱ्या गहू-तांदळाचा पुरवठाही बंद केला आहे.पुरवठा विभागाकडून बालगृहांना दरमहा नारी निकेतन योजनेंतर्गत नियमितपणे मिळणारे धान्य अचानक बंद झाल्याने महाराष्ट्रातील १ हजार बालगृहांतील ८० हजारांवर अनाथ, निराधार बालकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्थांची १ हजार बालगृहे कार्यरत आहेत. या संस्थांना शासनाकडून प्रति दिन प्रति बालक २१ रुपये अनुदान मिळते, हे अनुदानही गेल्या तीन वर्षांपासून नसल्याने बालगृहे बिकट परिस्थितीतून जात असताना गेल्या चार महिन्यांपासून पुरवठा विभागाकडून बीपीएल दराने मिळणारे गहू आणि तांदळाचे नियतन बंद झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती झाली आहे. खुल्या बाजारातून धान्य खरदी करणे संस्थाचालकाना परवडत नाही. पुरवठा विभागाने बालगृहांची दयनीय स्थिती बघता या सेवाभावी संस्थांना पूर्वीप्रमाणे विनाविलंब बीपीएल दराने गहू, तांदूळ देण्याचे संबंधित तालुक्याच्या पुरवठा यंत्रणेला आदेशित करावे, अशी मागणी स्वयंसेवी बालगृहचालक करीत आहेत.एकीकडे राज्यातील शासकीय गोदामात स्वस्त धान्य अक्षरश: सडून जात असताना बालगृहातील निराश्रित बालकांना धान्यासाठी झगडावे लागत असल्याची विसंगती सुन्न करणारी आहे. राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नी लक्ष घालून बालगृहांना न्याय मिळवून द्यावा. - रवींद्रकुमार जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र बालगृह चालक संघटना