शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘इंग्रजांच्या खबऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये’

By admin | Updated: February 20, 2016 03:07 IST

हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.

मुंबई : हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ते गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करून खा. चव्हाण यांनी सद्य:स्थितीला केंद्रातील भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणात विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरून भाजपा व संघाने काँग्रेस व राहुल गांधींविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकार आणि संघ हेच केवळ देशप्रेमी आणि त्यांना विरोध करणारे इतर सर्व देशद्रोही, असे वातावरण देशात निर्माण केले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यास समर्थन देणाऱ्यांना राष्ट्रभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवालही खा. चव्हाण यांनी केला.राजकीय लाभासाठी भाजपा देशातील सामाजिक सौहार्दाला तडा देत आहे. देशभरातील काँग्रेस नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. साहित्यिक, कलावंत, पत्रकार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकावर विद्यमान सरकारची दडपशाही सुरू आहे. संघाची मानसिकताच हुकूमशाही समर्थक असल्यामुळे राजस्थानातील भाजपाचा आमदार राहुल गांधींना गोळ्या घालण्याची भाषा करतो. काँग्रेस पक्ष त्याचा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवेल, असे खा. चव्हाण म्हणाले.