शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

वास्तव समोर आणणे, हे भगवीकरण नव्हे

By admin | Updated: October 10, 2015 03:11 IST

देशातील इतिहास, संस्कृती व शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपले विचार लादले व अनेक बाबी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रत्यक्षात ज्यावेळी इतिहासातील

नागपूर : देशातील इतिहास, संस्कृती व शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपले विचार लादले व अनेक बाबी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रत्यक्षात ज्यावेळी इतिहासातील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न होतो तेव्हा भगवीकरणाची ओरड करण्यात येते. वास्तविकता समोर आणणे हे भगवीकरण नाही, असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा. अजय संचेती, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाचे अध्यक्ष डॉ.विमल प्रसाद अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाचे योग्य बीजारोपण झाले नाही व त्यामुळेच अनेक समस्या व आव्हाने निर्माण झाली. देशाच्या शिक्षणप्रणालीतून संस्कृती व इतिहासाचे मूळ समोर आले पाहिजे आणि विकास साधताना हे आवश्यकच आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिक्षणक्षेत्राच्या व्यावसायिकीकरणावर चिंता व्यक्त केली. इतर क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातदेखील सामाजिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येत आहे. अनेक शिक्षकांनी शिक्षणाला व्यवसाय समजून काम सुरू केले आहे. यातून आदर्श पिढी कशी निर्माण होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘एकम् सत्’ या स्मरणिकेचे तसेच ‘एकात्ममानव दर्शन’ या शैक्षणिक मंथन विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. या अधिवेशनाला विविध राज्यांतील बाराशेहून अधिक प्रतिनिधी आले आहेत. आयुर्वेद विद्यापीठ गरजेचेराज्यात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे? ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे? किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे दिली. श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.