शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे

By admin | Updated: October 20, 2016 06:00 IST

राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी

मुंबई : राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी दिले. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी, आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीची बैठक राजभवन येथे झाली. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला. या वेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी समन्वयातून प्रयत्न करायला हवेत, तसेच आश्रमशाळांमध्ये आरोग्य सुविधा आणि सकस आहार विशेष उपलब्ध करून द्यावा. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दोन जेवणांमध्ये जास्त कालावधी ठेवू नये.’ राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याने, त्याची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी, ३० मे २०१६ रोजी डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, कुपोषण निर्मूलन आणि आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्यातील १९ आश्रमशाळांना भेटी देत, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला. दहा वर्षांत १,०७७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला असून, त्यात सर्पदंश, पोटदुखी, ताप, अपघात, आत्महत्या आदी कारणांचा समावेश असल्याचा समितीने निष्कर्ष काढला. यासोबतच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांची पाहणी करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सकस आहार आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याची, तसेच विद्यार्थ्यांच्या दोन जेवणांमध्ये दीर्घ कालावधी असता कामा नये, अशा सूचनाही समिती सदस्यांनी केल्या आहेत. परिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी. ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. सुचविलेल्या उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. (प्रतिनिधी)>समिती सदस्यांच्या सूचनापरिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी.ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. यामुळे विद्यार्थिनींमध्ये विश्वास निर्माण होऊन, घटनेबाबत त्या महिला अधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने बोलू शकतील.उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यावर संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने भविष्यातही या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी या वेळी दिले.