शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे

By admin | Updated: October 20, 2016 06:00 IST

राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी

मुंबई : राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी दिले. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी, आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीची बैठक राजभवन येथे झाली. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला. या वेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी समन्वयातून प्रयत्न करायला हवेत, तसेच आश्रमशाळांमध्ये आरोग्य सुविधा आणि सकस आहार विशेष उपलब्ध करून द्यावा. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दोन जेवणांमध्ये जास्त कालावधी ठेवू नये.’ राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याने, त्याची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी, ३० मे २०१६ रोजी डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, कुपोषण निर्मूलन आणि आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्यातील १९ आश्रमशाळांना भेटी देत, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला. दहा वर्षांत १,०७७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला असून, त्यात सर्पदंश, पोटदुखी, ताप, अपघात, आत्महत्या आदी कारणांचा समावेश असल्याचा समितीने निष्कर्ष काढला. यासोबतच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांची पाहणी करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सकस आहार आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याची, तसेच विद्यार्थ्यांच्या दोन जेवणांमध्ये दीर्घ कालावधी असता कामा नये, अशा सूचनाही समिती सदस्यांनी केल्या आहेत. परिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी. ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. सुचविलेल्या उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. (प्रतिनिधी)>समिती सदस्यांच्या सूचनापरिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी.ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. यामुळे विद्यार्थिनींमध्ये विश्वास निर्माण होऊन, घटनेबाबत त्या महिला अधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने बोलू शकतील.उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यावर संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने भविष्यातही या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी या वेळी दिले.