शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील भारत महोत्सवाची शानदार सांगता

By admin | Updated: January 17, 2017 03:20 IST

ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या महोत्सवाचा सांगता सोहळा पार पडला असून यामध्ये सहभागी कलाकारांचा गुणगौरव करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत या महोत्सवाला तीन दिवसांमध्ये असंख्य नागरिकांनी भेट दिली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत. कदम यांनीही या महोत्सवाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा यामध्ये विविधता असूनही एकात्मता कशी साधता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत महोत्सव अशा शब्दात कदम यांनी या महोत्सवाची स्तुती केली. यावेळी आशियातील सर्वात जलद चित्र रेखाटणारा चित्रकार अशी ख्याती असलेल्या विलास नायक यांनी या महोत्सवात प्रात्यक्षिक सादर केले. या महोत्सवाच्या महिनाभर आधीपासून शहर स्वच्छतेवर भर देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. सोसायट्यांमध्ये राबविले जाणारे उपक्रम, स्वच्छता, पर्यावरण आदींचे परीक्षण करून तीन उत्कृष्ट सोसायट्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ऐरोली सेक्टर २९ परिसरातील विजयदीप सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला, सेक्टर २९ परिसरातील गायत्रीधाम सोसायटी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तिसरा क्रमांक सेक्टर ३० परिसरातील कृष्णकुंज सोसायटीने पटकाविला. गोठीवली गावातील विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचाही याठिकाणी सत्कार करण्यात आला. या महोत्सवात वसईतील जुचंद्र येथील रांगोळी कलाकार तसेच शिल्पकारांनीही कलांचे प्रात्यक्षिक सादर केले. रुद्राक्ष डान्स अकादमीच्या वतीने या महोत्सवात नृत्याविष्कार सादर करण्यात आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना पैठणी तर पुरुषांना सफारींचे वितरण करण्यात आले. महोत्सवादरम्यान महिलावर्गासाठी राबविण्यात आलेल्या पाककृती स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम.के. मढवी, नगरसेविका पूनम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. >माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच नवी मुंबईकरांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली. सर्वच क्षेत्रातील कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावली.