शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

नागेश्वरी नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: August 23, 2016 02:57 IST

महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे. हा पूल ब्रिटीशकालीन नसला तरी पुलाची बिकटावस्था झाली आहे. पुलाच्या दुरूस्तीची मागणी अनेक वेळा करूनही न झाल्याने आता हा पूल नव्यानेच बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.म्हाप्रळ -पंढरपूर मार्ग हा महाड तालुक्यातून जातो. महाडमधील खाडीपट्टा भागातील चिंभावे, तुडील, सव अशी गावे जोडत हा मार्ग महाडजवळ राजेवाडी गावालगत महाड भोर मार्गाला जोडला गेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर राज्यमार्ग झाल्यापासून हा पूल अस्तित्वात आहे. दादली याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या समकालीन हा पूल आहे. या पुलावरून रत्नगिरी जिल्हयातील गावांकडे जाणारी वाहने तसेच महाड आणि पुणे येथे जाणाऱ्या वाहनांबरोबरच महाडकडे येणारी छोटी वाहने मोठयाप्रमाणात ये-जा करीत असतात. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात या पुलावरून कायम नागेश्वरी नदीचे पाणी जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटतो.नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुलाचे कठडे देखील वाहून गेले आहेत. याठिकाणी कायम खाडीचे खारे पाणी असल्याने आणि या खाडीतून येणाऱ्या रसानमिश्रीत पाण्यामुळे पुलाच्या खांबांचे नुकसान झाले आहे. वरील सिमेंट निघून गेले असून आतिल लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या आहेत. यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्टयातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठया प्रमाणावर विट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरून पावसाळयात नदीच्या पुराने पाणी देखील जाते. यामुळे पावसाळयात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. दोन जिल्हयांना जोडणारा हा मार्ग कायम वर्दळीचा असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. या पुलाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. (वार्ताहर)>पुलाची उंची कमीम्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग दोन जिल्हयांना जोडणारा राज्यमार्ग आहे. असे असून देखील या मार्गाकडे आणि रावढळ येथील पुलाकडे संबंधित विभाग कायम दुर्लक्ष करीत आले आहे. या पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात खाडीपट्टयातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत आता दुरूस्ती नको तर पुल नवीन बांधला गेला पाहिजे, असे रिपाइ तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.