शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नागेश्वरी नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: August 23, 2016 02:57 IST

महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे. हा पूल ब्रिटीशकालीन नसला तरी पुलाची बिकटावस्था झाली आहे. पुलाच्या दुरूस्तीची मागणी अनेक वेळा करूनही न झाल्याने आता हा पूल नव्यानेच बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.म्हाप्रळ -पंढरपूर मार्ग हा महाड तालुक्यातून जातो. महाडमधील खाडीपट्टा भागातील चिंभावे, तुडील, सव अशी गावे जोडत हा मार्ग महाडजवळ राजेवाडी गावालगत महाड भोर मार्गाला जोडला गेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर राज्यमार्ग झाल्यापासून हा पूल अस्तित्वात आहे. दादली याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या समकालीन हा पूल आहे. या पुलावरून रत्नगिरी जिल्हयातील गावांकडे जाणारी वाहने तसेच महाड आणि पुणे येथे जाणाऱ्या वाहनांबरोबरच महाडकडे येणारी छोटी वाहने मोठयाप्रमाणात ये-जा करीत असतात. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात या पुलावरून कायम नागेश्वरी नदीचे पाणी जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटतो.नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुलाचे कठडे देखील वाहून गेले आहेत. याठिकाणी कायम खाडीचे खारे पाणी असल्याने आणि या खाडीतून येणाऱ्या रसानमिश्रीत पाण्यामुळे पुलाच्या खांबांचे नुकसान झाले आहे. वरील सिमेंट निघून गेले असून आतिल लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या आहेत. यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्टयातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठया प्रमाणावर विट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरून पावसाळयात नदीच्या पुराने पाणी देखील जाते. यामुळे पावसाळयात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. दोन जिल्हयांना जोडणारा हा मार्ग कायम वर्दळीचा असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. या पुलाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. (वार्ताहर)>पुलाची उंची कमीम्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग दोन जिल्हयांना जोडणारा राज्यमार्ग आहे. असे असून देखील या मार्गाकडे आणि रावढळ येथील पुलाकडे संबंधित विभाग कायम दुर्लक्ष करीत आले आहे. या पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात खाडीपट्टयातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत आता दुरूस्ती नको तर पुल नवीन बांधला गेला पाहिजे, असे रिपाइ तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.