शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागेश्वरी नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: August 23, 2016 02:57 IST

महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे. हा पूल ब्रिटीशकालीन नसला तरी पुलाची बिकटावस्था झाली आहे. पुलाच्या दुरूस्तीची मागणी अनेक वेळा करूनही न झाल्याने आता हा पूल नव्यानेच बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.म्हाप्रळ -पंढरपूर मार्ग हा महाड तालुक्यातून जातो. महाडमधील खाडीपट्टा भागातील चिंभावे, तुडील, सव अशी गावे जोडत हा मार्ग महाडजवळ राजेवाडी गावालगत महाड भोर मार्गाला जोडला गेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर राज्यमार्ग झाल्यापासून हा पूल अस्तित्वात आहे. दादली याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या समकालीन हा पूल आहे. या पुलावरून रत्नगिरी जिल्हयातील गावांकडे जाणारी वाहने तसेच महाड आणि पुणे येथे जाणाऱ्या वाहनांबरोबरच महाडकडे येणारी छोटी वाहने मोठयाप्रमाणात ये-जा करीत असतात. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात या पुलावरून कायम नागेश्वरी नदीचे पाणी जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटतो.नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुलाचे कठडे देखील वाहून गेले आहेत. याठिकाणी कायम खाडीचे खारे पाणी असल्याने आणि या खाडीतून येणाऱ्या रसानमिश्रीत पाण्यामुळे पुलाच्या खांबांचे नुकसान झाले आहे. वरील सिमेंट निघून गेले असून आतिल लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या आहेत. यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्टयातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठया प्रमाणावर विट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरून पावसाळयात नदीच्या पुराने पाणी देखील जाते. यामुळे पावसाळयात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. दोन जिल्हयांना जोडणारा हा मार्ग कायम वर्दळीचा असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. या पुलाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. (वार्ताहर)>पुलाची उंची कमीम्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग दोन जिल्हयांना जोडणारा राज्यमार्ग आहे. असे असून देखील या मार्गाकडे आणि रावढळ येथील पुलाकडे संबंधित विभाग कायम दुर्लक्ष करीत आले आहे. या पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात खाडीपट्टयातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत आता दुरूस्ती नको तर पुल नवीन बांधला गेला पाहिजे, असे रिपाइ तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.