शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मोडल्याने वधूपित्याची आत्महत्या

By admin | Updated: March 3, 2015 01:13 IST

विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोणावळा : विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव राघू येवले (वय ४८, रा़ वाकसई, ता़ मावळ) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नवरदेव बाळू भागू लालगुडे (रा़ नायगाव, ता़ मावळ) याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासह इतर चौघांविरुद्ध फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. बाबूराव यांचा शेतीवर उदरनिर्वाह आहे. त्यांच्या मुलीचा विवाह नायगाव येथील भागू लालगुडे यांच्या मुलाशी ठरला होता़ २९ जानेवारीला वाकसई येथे कुंकुम तिलकाचा कार्यक्रम झाला होता़ विवाहाची तारीख १३ एप्रिल ठरली होती़ यानुसार नायगाव येथील एक मंगल कार्यालयही बूक केले होते़ अतिशय आनंदात विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना २० फेब्रुवारीला नवरदेवाने येवले यांना फोन करून ‘मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे नाही’, असे सांगत फोन बंद केला़ यानंतर येवले यांनी त्याला अनेकवेळा फोन केला; पण तो उचलत नव्हता़ यामुळे आपली फसवणूक झाली असून मुलाकडील मंडळी हुंड्यासाठी पिळवणूक करीत असल्याची तक्रार रविवारी (दि. १) बाबूराव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती़ या सर्व प्रकारामधून नैराश्य येऊन बाबूराव यांनी सोमवारी सकाळी घराजवळच शेतावर गुरांच्या पडवीला गळफास घेऊन आत्महत्या केली़या घटनेनंतर संतप्त झालेल्या वाकसई ग्रामस्थांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत शवविच्छेदनानंतर मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला़ ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी नवरामुलगा बाळू लालगुडे याला अटक करीत समोर आणल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला़ (वार्ताहर)४वर पक्षाकडून लग्न मोडल्याचा फोन आल्याने बाबूराव आणि त्यांचे कुटुंब सैरभैर झाले. ज्या प्रतिष्ठित मंडळीनी हा विवाह जुळवून आणला होता, त्यांना घेऊन नायगाव येथे मुलाच्या घरी जाऊन लग्न मोडू नका अशी विनवणी केली. यावेळी सुरुवातीला विवाह मोडला असाच मुद्दा लावून धरला. नंतर विवाह करायचा असेल तर ‘आम्हाला १० तोळे सोने व चारचाकी गाडी हुंडा म्हणून द्या, नाही तर लग्न मोडले, असे समजा’ असे सांगत हाकलून दिले़