शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

शरीरावर व्रण, विषाचा दर्प

By admin | Updated: September 12, 2014 00:50 IST

सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता,

नागपूर : सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता, सोनाली सारख्या ओकाऱ्या करीत होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे अमोलने सांगितले. तिच्या नाका-तोंडातून विषाचा उग्र दर्प येत असल्यामुळे तिने विष घेतले असावे, असा संशय सोनालीच्या आईवडिलांना आला. दरम्यान, १० सप्टेंबरच्या सकाळी ५.१५ ला डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले. लग्नाला तीन महिने पूर्ण व्हायचे असतानाच मुलीचा असा अंत झाल्यामुळे टिपले परिवाराला जबर मानसिक धक्का बसला.विष पाजून ठार मारल्याचा आरोप जावई अमोल याच्याकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी सोनालीला मारहाण करून, विष पाजून ठार मारले असावे, असा संशय सोनालीच्या वडिलांना आला. लकडगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून शंकरराव टिपले यांनी जावई अमोल बोरकर, त्याचा भाऊ राधेश्याम आणि आई रेखाबाई पांडुरंग बोरकर या तिघांनी संगनमत करून सोनालीला मारहाण केली आणि विष पाजून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून लकडगंजचे पीएसआय आनल दास यांनी कलम ४९८ (अ), ३२८, ३०४ (ब), ३४ अन्वये गुन्हे उपरोक्त तिघांवर गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी) आईला अखेरचे निमंत्रण ६ सप्टेंबरला सोनालीकडे कार्यक्रम होता. त्याची खरेदी करण्यासाठी ती भांडेप्लॉटकडे आली होती. यावेळी ती आईच्या घरी आली. आज (६ सप्टेंबर) आमच्याकडे कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वजण या, असे निमंत्रण तिने आई कमलाबार्इंना दिले. प्रकृती चांगली नसल्यामुळे कमलाबाई तिच्याकडे जाऊ शकली नाही. तीन दिवसानंतर कमलाबाईला दुसरा निरोप मिळाला. धावपळ करीत त्या पतीसोबत रुग्णालयात पोहचल्या. यावेळी सोनाली मृत्युशय्येवर होती. तिच्याशी संवाद करण्याचीही कमलाबार्इंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी (१० सप्टेंबर) सोनालीचा मृत्यू झाला. तिने ६ सप्टेंबरला आपल्या आईला दिलेले निमंत्रण अखेरचे ठरले. मुलीच्या निमंत्रणाला मान दिला नाही, याचे शल्य कमलाबाई यांना आता आयुष्यभर बोचणार आहे.