शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

रेल्वे ट्रॅकवरील गुन्ह्यांना ब्रेक

By admin | Updated: May 18, 2016 02:35 IST

मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो

मुंबई : मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो आणि त्यानंतर सतर्क नसलेल्या प्रवाशांना आठवण होते ती रेल्वे पोलिसांची (जीआरपी). एखादी महत्त्वाची वस्तू चोरीला गेल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते आणि त्याची दखल घेत पोलिसांकडून तत्काळ तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले जाते. रेल्वेतील गुन्हेगारीला रेल्वे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत ब्रेक लावण्यात येत आहे. २0१४ (जानेवारी ते डिसेंबर) ते २0१६ (जानेवारी ते एप्रिल) या काळात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) केलेल्या कारवाईत तब्बल ६९0 अट्टल गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ७ लाख ३१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. २0१५ सर्वाधिक गुन्हेगारांना अटक

२0१५मध्ये विविध गुन्ह्यांत ३१९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. २0१५च्या जानेवारीत ३0, एप्रिल महिन्यात ४२ तर मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी २८ गुन्हेगारांची धरपकड केली आहे. २0१६च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत प्रत्येकी ३0 तर एप्रिल महिन्यात २९ गुन्हेगारांना पकडले आहे.रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांना आमच्याकडून आळा घातला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, गुन्हेगारांनाही पकडण्यात यश आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. - विनोद चव्हाण, लोहमार्ग पोलीस, क्राइम ब्रँच- वरिष्ठ पोलीस निरीक्षक