शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकवरील गुन्ह्यांना ब्रेक

By admin | Updated: May 18, 2016 02:35 IST

मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो

मुंबई : मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो आणि त्यानंतर सतर्क नसलेल्या प्रवाशांना आठवण होते ती रेल्वे पोलिसांची (जीआरपी). एखादी महत्त्वाची वस्तू चोरीला गेल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते आणि त्याची दखल घेत पोलिसांकडून तत्काळ तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले जाते. रेल्वेतील गुन्हेगारीला रेल्वे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत ब्रेक लावण्यात येत आहे. २0१४ (जानेवारी ते डिसेंबर) ते २0१६ (जानेवारी ते एप्रिल) या काळात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) केलेल्या कारवाईत तब्बल ६९0 अट्टल गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ७ लाख ३१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. २0१५ सर्वाधिक गुन्हेगारांना अटक

२0१५मध्ये विविध गुन्ह्यांत ३१९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. २0१५च्या जानेवारीत ३0, एप्रिल महिन्यात ४२ तर मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी २८ गुन्हेगारांची धरपकड केली आहे. २0१६च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत प्रत्येकी ३0 तर एप्रिल महिन्यात २९ गुन्हेगारांना पकडले आहे.रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांना आमच्याकडून आळा घातला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, गुन्हेगारांनाही पकडण्यात यश आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. - विनोद चव्हाण, लोहमार्ग पोलीस, क्राइम ब्रँच- वरिष्ठ पोलीस निरीक्षक