शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नातवांच्या फराळाची गोडी कमी करतोय ‘त्यांच्या’ वास्तवाची कटुता

By admin | Updated: October 24, 2014 00:18 IST

‘लोकमत’ने जिल्ह्यातील अनेक पीडित आजी-आजोबांशी संपर्क साधला असता, हे सत्य उघडकीस आले़- दिवाळीची सामाजिक बांधीलकी

कोल्हापूर, : आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, आपल्याला उभे करण्यातच त्यांची अर्धी हयात संपली, अशा आई-बापांनाच त्यांच्या वृद्धापकाळात अनेकजणांनी धक्का दिला़ स्वत:च्या घरातच गुलामासारखी वागणूक दिली; पण नातवांना मात्र हे हाल पाहवले नाहीत. प्रत्येक दिवाळीच्या सणाला त्याच्या आईने केलेला फराळ आपल्या लाडक्या आजी-आजोबांना पोहोचविण्याचे काम त्यांनी इमानेइतबारे केले़ गेल्या चार वर्षांत याकामी त्यांनी एकदाही आळस केला नाही़ ही मुले आहेत संबंधितांच्या मुलांची़़. नातवांकडून येणारा हा फराळ त्यांच्या अनुभवाची कटुता कमी करीत आहे़ दिव्यांच्या उत्सवात सगळे जग न्हाऊन निघताना मुलांच्या अनपेक्षित वर्तनाने अंधारात लोटलेल्या आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ न चुकता पोहोचवून त्यांच्या कोरड्या मनात जिव्हाळ्याचा झरा अखंडित वाहत ठेवण्याचे काम ही नातवंडे करीत आहेत़ दिवाळीनिमित्त ‘लोकमत’ने जिल्ह्यातील अशा अनेक पीडित आजी-आजोबांशी संपर्क साधला असता, हे सत्य उघडकीस आले़ गृृहकलह, आजारपण आणि संपत्तीचा वाद या प्रमुख कारणांमुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याचे किंवा स्वतंत्र ठेवण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत़ सणासुदीच्या दरम्यान त्यांना येणारा एकटेपणाचा अनुभव बेचैन करणारा असतो़ आपल्या मामाच्या या निर्दयी वर्तनाने कोमल, अजय, प्राजक्ता, युवराज यांसारखी अनेक नातवंडे व्यथित आहेत. आपल्या पीडित आजी-आजोबांना न चुकता दिवाळीचा फराळ घेऊन जातात तेव्हा त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते अन् ही नातवंडेच त्यांना ‘टू बी आॅर नॉट टू बी धिस इज अ क्वश्चन’ या मानसिकतेतून सावरतात. (प्रतिनिधी)