शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जलसंधारणाला ‘ब्रेक’

By admin | Updated: January 7, 2015 01:29 IST

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या १ हजार ३५१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली

यदु जोशी - मुंबईजलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या १ हजार ३५१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली असून, आता या कामांची तांत्रिक व्यवहार्यता तपासूनच ती हाती घेण्यात येतील, अशी भूमिका जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. जलसंपदा विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती आता या कामांची शाहनिशा करेल. तांत्रिक बाजू आणि व्यवहार्यता तपासून बघेल आणि शासनाला अहवाल देईल. त्यानंतर ही कामे घ्यायची की नाही आणि घ्यायची तर कधी घ्यायची, या बाबतचा क्रम निश्चित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.१ हजार ३५१ कोटी रुपयांच्या या कामांमध्ये मुख्यत्वे सिमेंट नाला बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण बंधारे, पाझर तलाव बांधणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील आहेत. मात्र निविदा निघालेली आणि कार्यादेश जारी करण्यात आलेली कामे थांबविली जाणार नाहीत.आघाडी सरकारच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत आणि जलसंधारण मंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डी. एम. लिहितकर यांनी ही कामे मंजूर करण्यावर भर दिला होता. तथापि, आधी या विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि नंतरचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी कामांबाबत अव्यवहार्य असल्याची भूमिका घेतल्याने विभागांतर्गत मतभेद उघड झाले होते. एकाचवेळी हजार कोटींपेक्षा अधिकची कामे घेतल्याने राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल आणि जलसंधारण मंडळाचे मोठे दायित्व निर्माण होईल, असे कामांना विरोध करणाऱ्यांची भूमिका होती. तर दुसरीकडे जलसंधारण मंडळाला राज्य शासन दरवर्षी ४०० कोटी रुपये देत असते. मात्र सन २००० ते २००५ या काळात त्यातील केवळ १०६ कोटी रुपये देण्यात आले.च्लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी कामांना मंजुरी दिली होती.च्या विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि नंतरचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी एवढी मोठी कामे एकाचवेळी घेणे अव्यवहार्य असल्याची भूमिका घेतल्याने विभागांतर्गत मतभेद उघड झाले होते.