शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

अवास्तव बांधकामांना ब्रेक

By admin | Updated: July 23, 2014 01:00 IST

उपलब्ध जागेचा योग्य वापर न करता नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविणे आता सरकारी कार्यालयांना शक्य होणार नाही. कार्यालयात खरंच जागेची चणचण आहे हे पटवून दिल्यावरच त्यांना

जागेचा योग्य वापर: द्यावे लागणार प्रमाणपत्रचंद्रशेखर बोबडे - नागपूरउपलब्ध जागेचा योग्य वापर न करता नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविणे आता सरकारी कार्यालयांना शक्य होणार नाही. कार्यालयात खरंच जागेची चणचण आहे हे पटवून दिल्यावरच त्यांना विस्तारीकरणासाठी किंवा नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने यासंदर्भात ८ जुलैला परिपत्रक जारी केले असून शासकीय इमारतींचा विस्तार किंवा नवीन कार्यालयांचे बांधकाम याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. त्याचे काटेकोर पालन झाल्यास इमारत बांधकामावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.शासकीय कार्यालयांची दुरुस्ती, विस्तार आणि नवीन इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. त्यासाठी संबंधित कार्यालयांकडून बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो व बांधकामासाठी आग्रहही धरला जातो. अनेक वेळा गरज नसताना प्रस्ताव पाठविले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यातूनच नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे, असे राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी यासंदर्भात पाठविलेल्या शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. हे पत्रक सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.कार्यालयात उपलब्ध असलेल्या जागेचा योग्य वापर केला जात नाही. अनेक कार्यालयात बहुतांश जागा मोडके फर्निचर ठेवण्यासाठी वापरली जाते. दैनंदिन वापरात नसल्याने काही कार्यालयातील खोल्या कायम बंद राहतात व त्यामुळे त्या दुर्लक्षित राहतात. पण दुसरीकडे नवीन कार्यालयासाठी प्रस्ताव पाठविले जातात, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.नवीन नियमावलीनुसार यापूर्वी ज्या शहरातून नवीन बांधकामासाठी प्रस्ताव आले असतील त्यांना आता त्यांच्या कार्यालयातील उपलब्ध जागेचा कसा वापर करण्यात आला आणि वापरण्यासाठी जागा शिल्लक नाही याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित विभागाच्या सचिवांना प्रादेशिक विभागप्रमुखांकडून घ्यावे लागेल. तसे न केल्यास प्रस्ताव नाकारण्यात येणार आहे. नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत अनेक कार्यालये सध्या रिकामी आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील मनरेगाचे कार्यालय प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाल्याने तेथील जागा शिल्लक आहे. याच कार्यालयातील अनेक गाळे बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मूळ इमारतीत जागा अपुरी असली तरी परिसरात असलेल्या इतर विभागांत मात्र जागेचा योग्य उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)