शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रिपाइं ऐक्याआधी भाजपाशी युती तोडा!

By admin | Updated: May 3, 2017 04:08 IST

रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची

मुंबई : रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केले आहे. भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाच्या विचारांत फरक असून, रिपब्लिकन ऐक्याची घोषणा करणाऱ्यांनी आधी धर्मांध पक्षाची साथ सोडावी, असेही रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले आहे.खरात म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची आघाडी किंवा ऐक्य करण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे. समाजातील सर्व घटकांना एकसंघ करून रिपब्लिकन पक्ष तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाची निर्मिती शोषितांना न्याय मिळवून देणे व धर्मांध, जातीयवादी, प्रांतवादी व मनुवादी पक्षांना विरोध करण्यासाठी झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन काहीही करून सत्ता हस्तगत करणे, हे रिपब्लिकन पक्षाचे ध्येय नाही, असे म्हणत खरात यांनी आठवलेंना चिमटा काढला आहे.भाजपा हा जहाल हिंदुत्ववादी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाच्या व भाजपाच्या विचारात फरक आहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची आघाडी, विलीनीकरण अथवा ऐक्य करावयाच्या आधी आठवले यांनी भाजपाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात आणावेत, असे आवाहन खरात यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ऐक्य विचारांचे व्हावे, सत्ता हे आपले अंतिम ध्येय नाही, असेही खरात यांनी सांगितले. बौद्धमय भारत निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असून, आंबेडकरवादी व मनुवादी एका नावेत बसू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)