शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने ७० लाख वृक्ष लागवडीला ‘ब्रेक’

By admin | Updated: July 7, 2014 00:56 IST

शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत अमरावती विभागाला अडीच कोटी व जिल्ह्याला ७० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी कृषी व वन विभागासह अन्य विभागाने तयारी केली आहे. मात्र जूनपासून पावसाने दडी

अमरावती : शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत अमरावती विभागाला अडीच कोटी व जिल्ह्याला ७० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी कृषी व वन विभागासह अन्य विभागाने तयारी केली आहे. मात्र जूनपासून पावसाने दडी मारल्याने तूर्तास या योजनेला ब्रेक लागला आहे. वातावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता आहे. आधुनिक युगात ग्लोबल वार्मिंगमुळे तर निसर्गच बदलत आहे, या पार्श्वभूमीवर शतकोटी वृक्ष लागवड योजना महत्त्वाची आहे. यासाठी शासनाचे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था याद्वारे वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकूण पर्यावरण क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वृक्षाच्छादित असले पाहिजेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. राज्यात मात्र हे क्षेत्र केवळ २१ टक्केच असल्याने मागील काही वर्षांपासून ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविणे महत्त्वाचे आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येते. यामध्ये २० कलमी कार्यक्रमांतर्गत वन विभाग, महाराष्ट्र वन विभाग महामंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांना दरवर्षी वृक्ष लागवडीचे ‘लक्ष्यांक’ देऊन करोडोचा निधी उपलब्ध करण्यात येतो.मागील पाच वर्षांत या विभागाद्वारे वृक्षारोपणावर ३५६ कोटी ६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक निधी वन विभागाला २७५ कोटी ३५ लक्ष रूपये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाला २६ कोटी १२ लक्ष व सामाजिक वनीकरण विभागाला ५४ कोटी ५९ लाख रूपये देण्यात आलेले आहे. करोडो रूपयांचा शासन निधी यावर खर्च करीत असताना पावसाच्या लपंडावामुळे योजनेत अडथळे येत आहेत. (प्रतिनिधी)