शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ताशी १३0च्या वेगाला ‘ब्रेक’

By admin | Updated: December 29, 2016 02:05 IST

मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) बाळगले होते. यासाठी सहा लोकल एमआरव्हीसीकडून मुंबईत दाखल केल्या जाणार होत्या, परंतु आरडीएसओच्या चाचणीत ‘नापास’ झाल्याने वेगवान लोकल दाखल करण्यासाठी सिमेन्स कंपनीशी असणारे कंत्राट एमआरव्हीसीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ताशी १३0च्या वेगाला ब्रेकच लागला आहे. एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-१ अंतर्गत सिमेन्स कंपनीच्या लोकल गेल्या १० वर्षांत टप्प्याटप्प्यांत दाखल झाल्या. पश्चिमबरोबरच मध्य रेल्वेवरही लोकल दाखल झाल्यानंतर, त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. त्याच वेळी एमयूटीपी-१ अंतर्गत ताशी १३0 किमी वेगाने धावणाऱ्या लोकल मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर चालविण्याचा निर्णयही एमआरव्हीसीने घेतला. मात्र, एमयूटीपी-१मध्ये असलेले अन्य मोठे प्रकल्प पाहता, ताशी १३0 वेगाच्या लोकलचा प्रकल्प एमयूटीपी-२मध्ये समाविष्ट करण्यात आला. या लोकलसाठी सिमेन्स कंपनीशी १0८ बोगींचा (चाकांचा आकार) करार करण्यात आला. त्याची एकूण किंमत ही ६0 कोटी रुपये ठरवण्यात आली. प्रत्येक डब्यासाठी दोन बोगी, याप्रमाणे ५४ डब्यांसाठी या बोगी बसविण्याचे ठरवले. म्हणजेच नऊ डब्यांच्या सहा नव्या लोकल दाखल करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवल, परंतु या लोकल दाखल करण्यापूर्वी त्यांना तांत्रिक चाचणी पास करणे आवश्यक होते. रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) करण्यात येणाऱ्या खडतर चाचणीतून पास झाल्यानंतरच, ताशी १३0 किमी वेगाचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र, आरडीएसओकडून एका बोगीच्या घेण्यात आलेल्या चाचणीत सिमेन्स नापास झाली. त्यामुळे एमआरव्हीसीने सर्व १0८ बोगींचे असणारे कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या बोगी डब्यांना जोडून नव्या लोकल चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनविल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)चाचणीत लोकल नापासया संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, करार रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १0८ बोगींचे हे कंत्राट होते, परंतु आरडीएसओच्या चाचणीत नापास झाल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.- बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर टप्प्याटप्प्यांत दाखल होत आहेत. या लोकलचा जास्तीत जास्त वेग ताशी ११0पर्यंत जाऊ शकतो.सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या लोकल या ताशी १00पर्यंत वेगाने धावू शकतात.भविष्यात मुंबईतील रेल्वे ट्रॅकचा वेग आणखी वाढल्यास या लोकलही तेवढ्याच वेगाने धावतील, याप्रमाणे त्याचे नियोजन करण्यात आले होते. ताशी १३0च्या वेगाने धावणाऱ्या लोकल आणून त्या जलद मार्गावर चालविण्याचे स्वप्न होते.पश्चिम व मध्य रेल्वेवर बारा डबा लोकल धावत आहेत. त्यामुळे नऊ डबा लोकल आणून नक्की कोणता फायदा साध्य होणार होता, असा सवालही उपस्थित होत आहे.