शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

न्यायालयांत अनावश्यक प्रकरणे दाखल करण्यावर लागणार ‘ब्रेक’

By admin | Updated: September 18, 2014 00:43 IST

राज्य शासनाकडून त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : राज्यात विवाद धोरण लागूनागपूर : राज्य शासनाकडून त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत फटकारल्यामुळे शासनाने राज्यात विवाद धोरण (लिटिगेशन पॉलिसी) लागू केले आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात गेल्या २७ आॅगस्ट रोजी निर्णय जारी केला आहे.कनिष्ठ न्यायालये किंवा लवादांनी विरोधात निर्णय दिल्यास राज्य शासन बाजू बळकट नसतानाही वरिष्ठ न्यायालयात अपील करत होते. शासन गरज नसताना न्यायालयांवरील कामाचे ओझे वाढवित असल्याची व सार्वजनिक निधीचा अपव्यय करीत असल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ‘राज्य शासन वि. राजेंद्र टापर’ याप्रकरणात न्यायालयाने ४ आॅगस्ट रोजी राज्यात विवाद धोरण लागू करण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्य सचिवांना समन्स बजावण्यात आला होता. तसेच, हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारण्याचे निर्देश प्रबंधन कार्यालयाला दिले होते. शासनाने आज, बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यात २७ आॅगस्टपासून विवाद धोरण लागू करण्यात आल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)धोरणातील तरतुदी१) धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यतंत्रविषयक योजना तयार करण्यात येईल. त्यानुसार राज्य, विभाग व जिल्हास्तरीय अधिकार प्रदत्त समित्यांची स्थापना करण्यात येईल.२) सरकारी वकिलांसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात अवर सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या किमान एका मध्यस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मध्यस्त अधिकारी प्रकरणांच्या क्रियाशील व्यवस्थापनासाठी जबाबदार राहील.३) अनावश्यक तहकुबी टाळण्यासाठी सरकारी वकील व प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये आंतरसंवादाची प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांची दैनंदिन कार्यवाही व घडामोडीची माहिती संबंधितांना करून देण्यात येईल.४) एकतर्फी आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यापूर्वी संबंधित आदेश रद्द करण्याकरिता एखादा अर्ज करणे योग्य ठरेल काय यावर विचार करावा. ५) सत्र न्यायालयातील फौजदारी प्रकरणांसाठी अतिरिक्त जलदगती न्यायालये स्थापन करता यावी याकरिता शासन योजना तयार करेल. तसेच संवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल.धोरणाची वैशिष्ट्ये१) विवादातील मध्यवर्ती मुद्यांचे कालमर्यादित पद्धतीने व्यवस्थापन करणे.२) उच्चस्तरीय समितीमार्फत सर्व प्रलंबित प्रकरणांचे पुनर्विलोकन करणे.३) मुदतबाह्य, निरुपयोगी व परिणामशून्य प्रकरणे निकाली काढणे.४) कोणतेही अपील, रिट याचिका, विशेष अनुमती याचिका दाखल करण्यापूर्वी प्रकरणांची काटेकोरपणे छाननी करण्याकरिता सक्षम यंत्रणा व मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे.५) शासकीय विधी अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करून जबाबदारीची संकल्पना मांडणे.६) दुय्यम न्यायालयांतील सुविधांमध्ये सुधारणा करून अतिरिक्त विशेष न्यायालये, जलदगती न्यायालये स्थापन करणे.