शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

विमानांच्या अत्यंत जलद सेवेला बसतो आहे ‘ब्रेक’

By admin | Updated: May 20, 2014 03:44 IST

बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरील ८२३ विमान उड्डाणे उशिराने धावल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिल अशा प्रत्येक महिन्याची तुलना केली असता उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण हे कमीच असल्याचे मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन विमानतळे असून, यात टी-२ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे. या नवीन विमानतळामुळे विमानांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही तांत्रिक आणि इतर विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे लांबणीवर पडत असून, ती उशिरानेच धावत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ३५३, त्यानंतर मार्च महिन्यात २५२ आणि एप्रिल महिन्यात २१८ उड्डाणे उशिराने धावली आहेत. एप्रिलमध्ये उशिराने धावलेल्या उड्डाणांमध्ये तर ६३ उड्डाणे जेट एअरवेजची, ५८ उड्डाणे एअर इंडियाची असून, ९७ उड्डाणे इतर विमान कंपन्यांची आहेत. हे प्रमाण पाहता ते कमीच होत असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील एका अधिकार्‍याने सांगितले. उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण जवळपास १३ टक्के कमी झाले आहे. याविषयी अधिकार्‍याने सांगितले की, जास्तीतजास्त तांत्रिक चुकांमुळेच उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण आहे. मात्र टी-२मुळे विमानांचा मार्ग सुकर झाला हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)