शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

विमानांच्या अत्यंत जलद सेवेला बसतो आहे ‘ब्रेक’

By admin | Updated: May 20, 2014 03:44 IST

बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरील ८२३ विमान उड्डाणे उशिराने धावल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिल अशा प्रत्येक महिन्याची तुलना केली असता उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण हे कमीच असल्याचे मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन विमानतळे असून, यात टी-२ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे. या नवीन विमानतळामुळे विमानांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही तांत्रिक आणि इतर विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे लांबणीवर पडत असून, ती उशिरानेच धावत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ३५३, त्यानंतर मार्च महिन्यात २५२ आणि एप्रिल महिन्यात २१८ उड्डाणे उशिराने धावली आहेत. एप्रिलमध्ये उशिराने धावलेल्या उड्डाणांमध्ये तर ६३ उड्डाणे जेट एअरवेजची, ५८ उड्डाणे एअर इंडियाची असून, ९७ उड्डाणे इतर विमान कंपन्यांची आहेत. हे प्रमाण पाहता ते कमीच होत असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील एका अधिकार्‍याने सांगितले. उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण जवळपास १३ टक्के कमी झाले आहे. याविषयी अधिकार्‍याने सांगितले की, जास्तीतजास्त तांत्रिक चुकांमुळेच उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण आहे. मात्र टी-२मुळे विमानांचा मार्ग सुकर झाला हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)