शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांचा परदेशाकडे ओढा!

By admin | Updated: April 30, 2017 01:22 IST

देशातील शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे ब्राह्मण मुलांचा परदेशाकडे ओढा असल्याचे मत पुण्याच्या महापौर

नाशिक/पुणे : देशातील शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे ब्राह्मण मुलांचा परदेशाकडे ओढा असल्याचे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी येथे चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे शुक्रवारी आयोजित परशुराम वेद पुरस्कार सोहळ््यात केल्याने वाद निर्माण झाला आहे. शनिवारी त्यांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले. टिळक यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर शाखेने निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे शिक्षणासाठी परदेशी गेलेले विद्यार्थी पुन्हा मायदेशी परतत नाही व त्यांच्या वृद्ध माता-पित्यांवर उतारवयात एकाकी जीवन जगण्याची वेळ येते. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तसेच परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मायदेशी परतण्याची इच्छाशक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचेही टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांगितले. शनिवारी त्यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या केसरी वाडा येथील निवासस्थानासमोर आंदोलन झाले. भाजपाची आरक्षणाबाबतची भूमिका कायम दुटप्पी राहिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मा. गो. वैद्य हे अनेकदा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. महापौरही आता त्याच रांगेत आल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.आरपीआय नाराजभाजपाबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) टिळक यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे व पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापौरांनी आपली भूमिका त्वरित मागे घेण्याची मागणी केली.‘आप’चे शहर पदाधिकारी मुकुंद किर्दत यांनीही महापौरांच्या भूमिकेवर जात्यंध व धर्मांध व्यक्ती दुसरे काय बोलणार, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)मूक मोर्चांमुळे ब्राह्मणही एकवटलेराज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या मोर्चांमुळे ब्राह्मण समाजही एकवटला असून, त्यामुळे पुण्यात निवडणुकीला उमेदवारी करताना अनेक ब्राह्मण संघटनांनी मला समर्थन दर्शवित पुण्यात राजकीय परिवर्तन घडविल्याचे टिळक यांनी नाशिकमध्ये नमूद केले. ब्राह्मण संघटनांचीही अशाप्रकारचा मोर्चा काढण्याची तयारी होती. परंतु या समाजाची प्रगती बुद्धिमत्तेच्या जोरावर झाली असून, त्यामुळे आरक्षणासाठी मोर्चा काढायचा नाही, असा मतप्रवाह निर्माण झाल्याचे टिळक म्हणाल्या. वादानंतर टिळक यांचे घूमजावब्राह्मण समाज किंवा आरक्षण असे निवडक शब्द वेचून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. परदेशी गेलेल्या भारतीय युवकांना पुन्हा देशात आणण्यासाठी सामाजिक वातावरण पोषक असले पाहिजे. तसे ते गेल्या ६० वर्षात झाले नाही, असे मी म्हणाले. वैयक्तिक मी किंवा माझा पक्षही आरक्षणविरोधी नाही. - मुक्ता टिळक, महापौर, पुणे