शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम

By admin | Updated: March 1, 2017 05:57 IST

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबतची शिक्षणमंत्र्यांची बैठक मंगळवारी निष्फळ ठरली आहे.

मुंबई : दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित व मान्य मागण्यांवर अंमलबजावणी करण्याची मागणी करत बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबतची शिक्षणमंत्र्यांची बैठक मंगळवारी निष्फळ ठरली आहे. सरकार महासंघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे तावडे यांनी सांगितले. मात्र आश्वासन नको, तर अंमलबजावणी करण्याची मागणी करत महासंघाने पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.महासंघाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनांनंतर सरकारने अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत. मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा लागत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. अधिकारी शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महासंघाने केली आहे. शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर करून मान्य केलेल्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी, असे आवाहनही महासंघाने केले आहे. अन्यथा शिक्षकांकडून होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाचीच असेल, असेही संघटनेने शासनास कळविले आहे. (प्रतिनिधी)