शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नववीत नापास झालेल्या मुलाने दहावीत मिळवले 90 टक्के

By admin | Updated: June 15, 2017 09:02 IST

विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - नापास होण्याच्या भितीने, नापास झाल्यामुळे किंवा कमी टक्केवारी मिळाली म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत राहणा-या अनिकेत उदादे (17) या मुलाने रात्रीची नोकरी करुन दहावीच्या शालांत परीक्षेत 90.2 टक्के गुण मिळवले. महत्वाचे म्हणजे अनिकेत 9 वी मध्ये नापास झाला होता. 
 
अनिकेत वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात काम करतो. त्याच्याकडे ऐरोली ते विक्रोळी या पट्ट्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांकडे पेपर पोहोचवण्याची जबाबदारी आहे. मध्यरात्री ते पहाटे चार वाजेपर्यंत वेगवेगळया विक्रेत्यांकडे वर्तमानपत्र पोहोचवण्याचे अनिकेतचे काम चालायचे. खरतर अंगमेहनत, कष्टाचे हे काम करुनही अनिकेतने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. नवव्या इयत्तेत नापास झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शिक्षण सोडून नोकरी करण्यास सांगितले. जेणेकरुन घरखर्चाला हातभार लागेल. त्यानुसार त्याने वर्तमानपत्र पोहोचवण्याची नोकरी सुरु केली. 
 
आणखी वाचा 
पुणे - वयाच्या 35 व्या वर्षी महिला SSC पास, 72 टक्के गुणांनी उत्तीर्ण
 
पण त्याचवेळी त्याने शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याने विक्रोळीत रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. रात्री नोकरी, दिवसा अभ्यास असा त्याचा दिनक्रम असायचा. शिक्षण माणसाचे आयुष्य बदलून टाकते यावर अनिकेतचा विश्वास असल्यामुळे त्याने शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. नापास झाल्यानंतरही तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला आणि स्वप्नांचा पाठलाग सुरु ठेवला. दहावीच्या परीक्षेत त्याने 85 टक्के गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. 
 
अनिकेतचे वडिल टेलर असून त्यांच्या कुटुंबात फारसे कोणी उच्चशिक्षित नाही. भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम अनिकेतचे रोलमॉडेल असून, त्यांच्या आत्मचरित्राने अनिकेतला शिकण्याची प्रेरणा दिली. त्याला एरोनॉटिकल इंजिनीयरींगमध्ये करीयर करण्याची इच्छा आहे. 
 
पुण्यात राहणा-या रेखा चौरेची कहाणी सुद्धा अशीच. लवकरच लग्न झाल्यामुळे रेखाला तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. पण कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळे रेखाने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल  जाहीर झाला. रेखा एसएससी बोर्डाची ही परीक्षा 72 टक्के गुणांनी उर्तीण झाली. शाळा सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी रेखा दहावीची परीक्षा उर्तीण झाली.