शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

नववीत नापास झालेल्या मुलाने दहावीत मिळवले 90 टक्के

By admin | Updated: June 15, 2017 09:02 IST

विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - नापास होण्याच्या भितीने, नापास झाल्यामुळे किंवा कमी टक्केवारी मिळाली म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत राहणा-या अनिकेत उदादे (17) या मुलाने रात्रीची नोकरी करुन दहावीच्या शालांत परीक्षेत 90.2 टक्के गुण मिळवले. महत्वाचे म्हणजे अनिकेत 9 वी मध्ये नापास झाला होता. 
 
अनिकेत वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात काम करतो. त्याच्याकडे ऐरोली ते विक्रोळी या पट्ट्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांकडे पेपर पोहोचवण्याची जबाबदारी आहे. मध्यरात्री ते पहाटे चार वाजेपर्यंत वेगवेगळया विक्रेत्यांकडे वर्तमानपत्र पोहोचवण्याचे अनिकेतचे काम चालायचे. खरतर अंगमेहनत, कष्टाचे हे काम करुनही अनिकेतने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. नवव्या इयत्तेत नापास झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शिक्षण सोडून नोकरी करण्यास सांगितले. जेणेकरुन घरखर्चाला हातभार लागेल. त्यानुसार त्याने वर्तमानपत्र पोहोचवण्याची नोकरी सुरु केली. 
 
आणखी वाचा 
पुणे - वयाच्या 35 व्या वर्षी महिला SSC पास, 72 टक्के गुणांनी उत्तीर्ण
 
पण त्याचवेळी त्याने शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याने विक्रोळीत रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. रात्री नोकरी, दिवसा अभ्यास असा त्याचा दिनक्रम असायचा. शिक्षण माणसाचे आयुष्य बदलून टाकते यावर अनिकेतचा विश्वास असल्यामुळे त्याने शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. नापास झाल्यानंतरही तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला आणि स्वप्नांचा पाठलाग सुरु ठेवला. दहावीच्या परीक्षेत त्याने 85 टक्के गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. 
 
अनिकेतचे वडिल टेलर असून त्यांच्या कुटुंबात फारसे कोणी उच्चशिक्षित नाही. भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम अनिकेतचे रोलमॉडेल असून, त्यांच्या आत्मचरित्राने अनिकेतला शिकण्याची प्रेरणा दिली. त्याला एरोनॉटिकल इंजिनीयरींगमध्ये करीयर करण्याची इच्छा आहे. 
 
पुण्यात राहणा-या रेखा चौरेची कहाणी सुद्धा अशीच. लवकरच लग्न झाल्यामुळे रेखाला तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. पण कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळे रेखाने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल  जाहीर झाला. रेखा एसएससी बोर्डाची ही परीक्षा 72 टक्के गुणांनी उर्तीण झाली. शाळा सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी रेखा दहावीची परीक्षा उर्तीण झाली.