शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वा-यावर सोडलेल्या मुलाला पोटगी

By admin | Updated: November 6, 2014 03:24 IST

हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी,

मुंबई : हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.आईचा मृत्यू झाला तेव्हा हा मुलगा जेमतेम तीन वर्षांचा होता. त्याला आपल्यासोबत न देता त्याचे वडील राजस्थानला गावाकडे निघून गेले. तेव्हापासून गेली १२ वर्षे त्याचा सांभाळ व पालनपोषण मुंबईतील त्याचा मामा करीत आहे. (या प्रकरणातील मुलगा अल्पवयीन आहे. त्यास भावी आयुष्यात त्रास होऊ नये यासाठी बातमीत त्याचे, त्याच्या वडिलांचे अथवा मामाचे नाव दिलेले नाही)खरे तर मुलाची जबाबदारी वडिलांनी घ्यायला हवी. परंतु ते त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. इतकी वर्षे भाच्याला आपण सांभाळले व शाळेतही घातले. पण स्वत:चे कुटुंब सांभाळण्याखेरीज भाच्याची जबाबदारी पेलणे कठीण जात आहे. त्यामुळे त्याच्या वडिंलाना दरमहा खर्ची द्यायला सांगावी, असा अर्ज या मुलाच्या वतीने मामाने केला होता. त्यावर वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने वडिलांनी मुलासाठी दरमहा दोन हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश कुटुंब न्यायालयाने आॅक्टोबर २००८ मध्ये दिला होता.याविरुद्ध भाच्याच्या वतीने मामाने केलेले अपील मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोटगीची रक्कम दोनवरून १० हजार रुपये अशी वाढविण्याचा आदेश दिला. पोटगीची २००८ पासूनची वाढीव रक्कम एक महिन्यात द्यावी व नोव्हेंबरपासूनची पोटगीची रक्कम दरमहा सात तारखेपर्यंत मुलाच्या बँक खात्यात थेट जमा करावी,असा आदेशही दिला गेला.या मुलाचे वडील मुळचे राजस्थानमधील नाथव्दार येथील आहेत. तेथे त्यांची साड्या व कपड्यांची दोन दुकाने आहेत. शिवाय ते कमिशन एजन्टचाही धंदा करतात. त्यांची साम्पत्तीक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने १० हजार रुपये ही पोटगीची रक्कम ठरविली. नाथव्दार येथील दुकाने आपली नाहीत, तर आपल्या वडिलांची आहेत व तेथे आपण नोकर म्हणून काम करतो व त्याबद्दल आपल्याला दरमहा जेमतेम दोन हजार रुपये पगार मिळतो, हा मुलाच्या वडिलांनी केलेला दावा खंडपीठाने अमान्य केला.मुलाच्या वडिलांनी विविध न्प्रकरणात उत्पन्न व सांम्पत्तीक स्थिती याविषयी निरनिराळी आकडेवारी दिली आहे. किंबहुना मुलाला पोटगी द्यावी लागू नये यासाठी पित्याने कुटुंब न्यायालयात खोटी माहिती दिली होती. (विशेष प्रतिनिधी)