शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

दोघांनीही समजुतीची भूमिका घ्यावी

By admin | Updated: September 17, 2014 02:15 IST

शिवसेना-भाजपा या पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

मुंबई : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला आपल्याला पराभूत करायचे असल्याने शिवसेना-भाजपा या पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. देशातील काही विधानसभा निवडणुकीतील निकाल पाहता राज्यातील निवडणुका सोप्या नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
आठवले यांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने भाजपाला देऊ केलेल्या जागांची व शिवसेनेच्या ‘मिशन 15क् ची माहिती आठवले यांना दिली.आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला पराभूत करणो ही आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे एक-दोन जागा कमी मिळाल्या तरी कुणीही ताणून धरू नये. देशातील काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर वेगवेगळे लढण्यात कुणाचेच हित नाही हे लक्षात 
घेतले पाहिजे. सत्ता समोर दिसत असताना वाद करीत बसलो तर हाता तोंडाशी आलेला सत्तेचा हात गमवावा लागेल.  रिपाइंने शिवसेनेकडे सहा तर भाजपाकडे सहा जागांची मागणी केली असली तरी दोन मोठय़ा पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटावा याकरिता आम्ही ताणून धरणार नाही, असे आठवले म्हणाले. 
 
विलासकाकांनी 
रिपाइंतून लढावे
काँग्रेसचे आमदार विलासकाका उंडाळकर यांचा कराड-दक्षिण मतदारसंघ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतला तर विलासकाकांनी रिपाइंच्या तिकीटावर महायुतीतून लढावे, असे आवाहन आठवले यांनी केले.