शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत वासनकरसह दोघांचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: October 10, 2014 00:57 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा आरोपी प्रशांत वासनकर याच्यासह तीन जणांविरुद्धच्या आरोपपत्राच्या वैधतेला आव्हान देत

विशेष न्यायालय : गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकरण, आरोपपत्राच्या वैधतेला दिले होते आव्हाननागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा आरोपी प्रशांत वासनकर याच्यासह तीन जणांविरुद्धच्या आरोपपत्राच्या वैधतेला आव्हान देत हक्काच्या जामिनासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर फेटाळून लावले. आरोपी प्रशांत जयदेव वासनकर आणि अभिजित जयंत चौधरी यांनी हे अर्ज दाखल केले होते. या प्रकरणातील फिर्यादी विवेक अशोक पाठक रा. लक्ष्मीनगर यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम खबरी अहवालानुसार वासनकरने पाठक यांची २ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांनी फसवणूक केलेली आहे. २७ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी, अशा तिघांना अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने २४ सप्टेंबर रोजी कायद्यानुसार ६० दिवसात आरोपी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि साळा अभिजित चौधरी यांच्याविरुद्ध ४ हजार पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दाखल करण्यात आलेले आरोपपत्र अपूर्ण व त्रुटीपूर्ण आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३(२),(५) मधील प्रावधानानुसार हे आरोपपत्र नाही. आरोपपत्रांच्या प्रतीही देण्यात आलेल्या नाहीत. अटकेच्या वेळी जप्त करण्यात आलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आरोपपत्रासोबत संलग्न करण्यात आलेले नाहीत. अंतिम अहवाल न्यायालयात दाखल होऊनही तपास सुरूच आहे, असा दावा न्यायालयात आरोपींच्यावतीने करण्यात आला. अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण आरोपपत्रामुळे आरोपीला आपोआप जामिनाचा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाच्यावतीने करण्यात आला. आरोपपत्र परिपूर्ण असल्याचे खंबीरपणे सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयाला युक्तिवादात सांगण्यात आले. ६० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९० अन्वये दखल घेऊन आरोपपत्रावर नोंद केली. एकदा आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले की, आरोपीला हक्काचा जामीन मिळण्याचा अधिकार राहत नाही. आरोपपत्र दाखल करताना राहून गेलेले दस्तऐवज कोणत्याही टप्प्यात न्यायालयात दाखल केले जाऊ शकतात, असा मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. या प्रकरणात ३०० तक्रारी आहेत. त्यामुळे ३०० प्रकरणे दाखल होऊ शकतात. मूळ तक्रारीबाबतचा तपास पूर्ण होऊन त्या संदर्भातील आरोपपत्र परिपूर्ण आहे, असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद सरकारच्यावतीने करण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी सहकार्य केले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एम. बी. नायडू आणि अ‍ॅड. प्रकाश नायडू यांनी काम पाहिले. पीडित गुंतवणूकदारांच्यावतीने अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)